शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 11:54 IST

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मनुष्यबळ वाढवा, २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नोंदी शोधण्याच्या कामाला गती द्यावी अशी विनंती आहे. उपोषण सोडताना जे ठरले होते त्याबाबत अजून सरकारने Time Bond दिला नाही, तो तातडीने द्यावा. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका. ओबीसीमध्ये आमचे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावे. त्यामुळे ते आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही. ठरल्याप्रमाणे Time Bond तातडीने द्यावा. मनुष्यबळ वाढवा २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्याव यावर ठाम आहोत. आम्हाला गाजर दाखवू नका. मुख्यमंत्र्यांनी, लिखित ठरलय तसा टाईमबाँड द्यावा. EWS मध्ये मराठा समाजाला ८.३० टक्के आरक्षण मिळू शकते. तेच OBC मध्ये फक्त ३.५० टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. 

मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे

या प्रश्नावर उत्तर देताना, ओबीसीत लाभ कमी होणार असे नाही. आमचे पूर्वीपासून, आमचे गिळलेले आहे, ते बाहेर काढायचे आहे. मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. काही कमी होणार नाही. आरक्षण कमी मिळणार नाही. ओबीसीत नोंदी सापडतील, त्याप्रमाणे मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सरकारबाबत मी सॉफ्ट नाही. आम्हाला OBC मध्ये घ्या आणि तुम्ही ७५ चे ९० टक्के आरक्षण करा. काही अडचण नाही. सरकारने नोंदी शोधण्यात निधी कमी पडू देऊ नये. तातडीने वर्ग करावे, नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. खोटी फसवणूक मराठा समाज सहन करणार नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, उगाच काही ओबीसी नेत्यांचे लाड करू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण