शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:59 IST

Manoj Jarange Patil News: २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एका कंबर कसली आहे. मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. केवळ मराठा आरक्षण नाही, तर बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणही मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरले आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. 

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, २८ ऑगस्टपर्यंत त्यांच्या ८ ते ९ प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. यासोबतच, अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषणही कायम राहणार आहे. यातच मनोज जरांगे पाटील बीड दौऱ्यावर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दौरा अर्धवट सोडण्याचे म्हटले जात आहे. 

बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांची अचानक तब्येत खालावली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे दोन रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा अध्यादेश तातडीने काढावा. ५८ लाख नोंदींचे पुरावे देऊनही आरक्षणाचा कायदा केला गेलेला नाही. मागील दोन वर्षांपासून संयम पाळला जात आहे. अनेक मागण्या प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येत आहे. २८ ऑगस्टनंतर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर माझ्या मराठा बांधवांसोबत मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण