शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:07 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: ओबीसींनी फुकटचे बसून आमचे आरक्षण खाल्ले. ओबीसी नेत्यांचा जातीयवाद आता उघडा पडला आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील जोरदार पलटवार केला.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे. लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी माझ्या समाजाची खंबीरपणाने पाठराखण करतो. यांचे विचार आणि नियत उघडी पडली आहे. यांचा जातीयवाद उघडा पडला आहे. मी जातीयवाद केला नाही. फक्त मागण्या लावून धरल्या आहेत, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या मागणीच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला.

कुणबी नोंदी रद्द करा, अशी मागणी करायची नाही. काही झाले तरी ५८ लाख कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत. लक्ष्मण हाके मराठा समाजाची राख करायला निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवे. सगळ्या ओबीसी नेत्यांचे खोटे मुखवटे उघडे पडले. गोरगरीब ओबीसी बांधवांचे वाटोळे करायची माझी इच्छा नाही. पण वेळ आल्यास मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. मी संयम धरला आहे. मराठा समाजालाही शांत राहण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, पण...

मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून शिकायला हवे. तुम्हीच तुमच्या समाजातील मुलांचे वाटोळे करायला निघाला आहात. मूळ नोंदी सापडूनही ते रद्द करा म्हणत आहेत. आपल्या हक्काचे आरक्षण दाबायला निघाले आहेत. ओबीसी नेत्यांचे खरे विचार मी जगासमोर आणले आहेत. हेच जातीयवाद करत आहेत. मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो, यामुळेच यांची पोटदुखी आहे. समाजावर अन्याय होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. मात्र, मराठ्यांवर अन्याय करू नका. ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून तुम्ही मराठ्यांवर १०० टक्के अन्याय करणार आहात. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात ते आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री का सांगत नाहीत, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

दरम्यान, आम्ही एकटे ५० ते ५५ टक्के आहोत. कसे आरक्षण मिळत नाही, तेच पाहतो. मराठा समाजाला फसवले, तर तुम्हाला बुडवलेच म्हणून समजा. हे लक्षात ठेवा. आधी मराठा समाज एकत्र नव्हता. निर्णय घ्यायला अडचणी येत होत्या. आता समाज एक झाला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेPoliticsराजकारण