शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:07 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: ओबीसींनी फुकटचे बसून आमचे आरक्षण खाल्ले. ओबीसी नेत्यांचा जातीयवाद आता उघडा पडला आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील जोरदार पलटवार केला.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे. लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी माझ्या समाजाची खंबीरपणाने पाठराखण करतो. यांचे विचार आणि नियत उघडी पडली आहे. यांचा जातीयवाद उघडा पडला आहे. मी जातीयवाद केला नाही. फक्त मागण्या लावून धरल्या आहेत, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या मागणीच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला.

कुणबी नोंदी रद्द करा, अशी मागणी करायची नाही. काही झाले तरी ५८ लाख कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत. लक्ष्मण हाके मराठा समाजाची राख करायला निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवे. सगळ्या ओबीसी नेत्यांचे खोटे मुखवटे उघडे पडले. गोरगरीब ओबीसी बांधवांचे वाटोळे करायची माझी इच्छा नाही. पण वेळ आल्यास मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. मी संयम धरला आहे. मराठा समाजालाही शांत राहण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, पण...

मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून शिकायला हवे. तुम्हीच तुमच्या समाजातील मुलांचे वाटोळे करायला निघाला आहात. मूळ नोंदी सापडूनही ते रद्द करा म्हणत आहेत. आपल्या हक्काचे आरक्षण दाबायला निघाले आहेत. ओबीसी नेत्यांचे खरे विचार मी जगासमोर आणले आहेत. हेच जातीयवाद करत आहेत. मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो, यामुळेच यांची पोटदुखी आहे. समाजावर अन्याय होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. मात्र, मराठ्यांवर अन्याय करू नका. ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून तुम्ही मराठ्यांवर १०० टक्के अन्याय करणार आहात. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात ते आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री का सांगत नाहीत, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

दरम्यान, आम्ही एकटे ५० ते ५५ टक्के आहोत. कसे आरक्षण मिळत नाही, तेच पाहतो. मराठा समाजाला फसवले, तर तुम्हाला बुडवलेच म्हणून समजा. हे लक्षात ठेवा. आधी मराठा समाज एकत्र नव्हता. निर्णय घ्यायला अडचणी येत होत्या. आता समाज एक झाला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेPoliticsराजकारण