शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:39 IST

Manoj Jarange Patil News: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, सरकारला थेट इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil News: बीड प्रकरण, परभणी प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची आक्षेपार्ह विधाने, अशा काही मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून, सातत्याने महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानावरून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. राज्यातील जनतेला सांगतो की, ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते, ते प्रत्यक्षात सध्या तरी येताना दिसत नाही. आता तशी परिस्थिती नाही, भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. आत्ता आपली परिस्थिती नाही, असे अजित पवारांनी सांगितले. यावरून आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल

अजित पवार म्हणत असतील की, आम्ही कर्जमाफी देणार नाही. तर, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नसतील तर यांच्याकडे बघावे लागणार आहे. त्यांना गावात यायचे बंद करावे लागेल, ती मोहीम मला सुरू करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही. शेतकऱ्यांचा पीक विमा दिला जात नाही. नुसते पंचनामे केले जातात. अनुदान दिले जात नाही. शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरू आहे. विरोधकही आमचा नाही आणि सत्ताधारी आमचे नाही. मराठ्यांच्या आरक्षणाने एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, तर आमचे म्हणणे आहे की, शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच करा. परंतु, तसे होणार नसेल, तर आता पुढच्या काळात यांच्याकडे पाहावे लागले, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, या दादांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेत दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असून लघू, छोटे व मध्यम उद्योग देशोधडीला लागले. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली. निवडणुकीच्या प्रचारात व जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये आदी अनेक आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसातच महायुतीच्या सरकारला याचा विसर पडला, अशी टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार