शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 11:46 IST

Manoj Jarange Patil On Farmers Issue: शेतकऱ्यांनी जागरुक झाले पाहिजे. वारंवार तेच तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची किंमत राहिलेली नाही. सरकार काही करत नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil On Farmers Issue: शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी नाही. एकीकडून सरकारने मारायचे दुसरीकडे निसर्गाने मारायचे, त्यामुळे करावे काय, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. रात्रंदिवस कष्ट करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार केला, तर डोळे पांढरे होतील. कारण, त्याच्या वाट्याला तेच आले आहे. सरकार साथ देत नाही. निसर्गही साथ देत नाही. निसर्गाने साथ दिली नाही, तरी सरकारने पाठबळ द्यायला हवे. कर्जमाफी करायला हवी. पाण्याची तातडीने व्यवस्था केली पाहिजे. जनावरांना चारा नाही. सरकार आता काहीच करत नाहीत. शेतकऱ्यांनी जागरूक होणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वारंवार तेच तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना किंमत राहिलेली नाही. शेतकऱ्यांनी शहाणे होणे गरजेचे आहे. मी माझ्या हितासाठी बोलत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्हीही त्यातून आलो आहोत. आम्ही आजही शेती करतो. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिताची बाजू मांडणारी लोक दिली पाहिजेत. मग शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पुढील काळात अवघड परिस्थिती होणार आहे, अशी भीती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. 

पैसे बुडवा असे म्हटलेले नाही

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये. पैसे येतील तेव्हा भरावे, यात चूक काय बोललो. मी पैसे बुडवा असे बोललो नाही. शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत, तर तो कुठून भरणार, असा सवाल करत, पैसे भरण्यासाठी शेतकरी जीव संपवायला लागलेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर तुमचे कुटुंब वाऱ्यावर पडत आहे. तुम्ही गेलात की कुटुंबही गेले. कुणाचा पाहुणा येत नाही की गावकरी येत नाहीत. शेतकऱ्यांनी माझ्या बोलण्याची भूमिका समजून घ्यावी. कुणाचेही पैसे बुडवा म्हणत नाही. तुमच्याकडे आल्यावर तुम्ही पैसे भरा. कुणावर केस केली तर न्यायालयात जा. शेतकऱ्यांनी न्यायालयात जावे. बाजू मांडावी. न्यायालय नक्कीच न्याय देईल. आत्महत्या का करत आहात, तो पर्याय नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली अनेक घरे पाहिली आहेत. शेतात काम करायला कुणी राहत नाही, येत नाही. मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. आत्महत्या केल्यावर सरकार लाख, दीड लाख रुपये देऊन त्यांची थट्टा करतात. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याची अशी थट्टा चालवली जाते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. जीवापेक्षा मोठे काही नाही. कुणी काही करू शकत नाही. खचून जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलFarmerशेतकरी