शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 11:46 IST

Manoj Jarange Patil On Farmers Issue: शेतकऱ्यांनी जागरुक झाले पाहिजे. वारंवार तेच तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची किंमत राहिलेली नाही. सरकार काही करत नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil On Farmers Issue: शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी नाही. एकीकडून सरकारने मारायचे दुसरीकडे निसर्गाने मारायचे, त्यामुळे करावे काय, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. रात्रंदिवस कष्ट करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार केला, तर डोळे पांढरे होतील. कारण, त्याच्या वाट्याला तेच आले आहे. सरकार साथ देत नाही. निसर्गही साथ देत नाही. निसर्गाने साथ दिली नाही, तरी सरकारने पाठबळ द्यायला हवे. कर्जमाफी करायला हवी. पाण्याची तातडीने व्यवस्था केली पाहिजे. जनावरांना चारा नाही. सरकार आता काहीच करत नाहीत. शेतकऱ्यांनी जागरूक होणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वारंवार तेच तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना किंमत राहिलेली नाही. शेतकऱ्यांनी शहाणे होणे गरजेचे आहे. मी माझ्या हितासाठी बोलत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्हीही त्यातून आलो आहोत. आम्ही आजही शेती करतो. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिताची बाजू मांडणारी लोक दिली पाहिजेत. मग शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पुढील काळात अवघड परिस्थिती होणार आहे, अशी भीती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. 

पैसे बुडवा असे म्हटलेले नाही

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये. पैसे येतील तेव्हा भरावे, यात चूक काय बोललो. मी पैसे बुडवा असे बोललो नाही. शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत, तर तो कुठून भरणार, असा सवाल करत, पैसे भरण्यासाठी शेतकरी जीव संपवायला लागलेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर तुमचे कुटुंब वाऱ्यावर पडत आहे. तुम्ही गेलात की कुटुंबही गेले. कुणाचा पाहुणा येत नाही की गावकरी येत नाहीत. शेतकऱ्यांनी माझ्या बोलण्याची भूमिका समजून घ्यावी. कुणाचेही पैसे बुडवा म्हणत नाही. तुमच्याकडे आल्यावर तुम्ही पैसे भरा. कुणावर केस केली तर न्यायालयात जा. शेतकऱ्यांनी न्यायालयात जावे. बाजू मांडावी. न्यायालय नक्कीच न्याय देईल. आत्महत्या का करत आहात, तो पर्याय नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली अनेक घरे पाहिली आहेत. शेतात काम करायला कुणी राहत नाही, येत नाही. मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. आत्महत्या केल्यावर सरकार लाख, दीड लाख रुपये देऊन त्यांची थट्टा करतात. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याची अशी थट्टा चालवली जाते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. जीवापेक्षा मोठे काही नाही. कुणी काही करू शकत नाही. खचून जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलFarmerशेतकरी