शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 14:19 IST

Manoj Jarange Patil: दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरी सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी १२ महिने झाले आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. पण आमचे शांततेत सुरू असलेले आंदोलन सरकारला कळत नसेल तर आमचा नाइलाज आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. यामुळे निवडणूक लढवायची वेळ आली तर पक्ष काढणार नाही, मात्र अपक्ष उमेदवार उभे करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तसेच राज्यभरात शांतता रॅली काढून मनोज जरांगे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे सांगितले जात आहे. 

काही दिवसांपूर्वी सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आता पुढील दिशा काय असेल, आगामी विधानसभा निवडणूक लढवायची का, याबाबत निर्णय घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी एक मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राखीव जागांवरती मराठा आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या इतर समाजातील उमेदवाराला पाठिंबा देऊ. २९ तारखेला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात पाच ते सहा गट तयार केले आहेत. ज्यावेळी माणूस कशामध्ये सापडत नाही त्यावेळी तो माणूस बदनाम केला जातो. बदनामीसाठी त्यांनीच एका जातीयवादी पीआयकडून माझ्या गेवराईमधील घरावर नोटीस चिकटवली आहे. माझ्या बदनामीसाठी बोलायला लावणारे राज्यात एकमेव ठिकाण मुंबईतील सागर बंगला आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. नेत्यांची माझ्यावर नाराजी असेल तर मग मराठा समाजाच्या नाराजीचे काय, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रसह राज्यात संपूर्ण मराठा समाज एक झाला आहे. राजकारण्यांनीच मराठा समाजाची विभागणी केली आहे, अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली.

आता केवळ मराठा समाजाची लाट

आता मराठा समाज हुषार झाला आहे. नेत्यांपेक्षा आणि पक्ष मोठे करण्यापेक्षा स्वतःचे कुटुंब मोठे करा याकडे समाजाचा कल आहे. आधी नेत्यांची लाट होती आता मराठा समाजाची लाट आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरीही सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण