शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

“टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 10:28 IST

Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: अजित पवारांना सांगतो की, ते शांत बसले नाही तर मीही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढताना दिसत आहे. ही टीका अधिकाधिक वैयक्तिक होताना पाहायला मिळत आहे. यातच आता, अजित पवारांना सांगणे आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही. टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी खूप गडबड चालू आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा नाव न घेता हल्लाबोल केला.

मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी जाऊन भेटी-गाठी घेत आहेत. मनोज जरांगे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातच छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेतून मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांनीही शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांमधील वाद वाढताना दिसत आहे. एका बैठकीत ठरले. सगळ्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की, जातीय तणाव निर्माण व्हायला नको. फक्त मनोज जरांगे पाटील यांनी कुणाचा एकेरी उल्लेख करु नये. मी शांत बसलो होतो तेव्हा येवल्यातील बोर्ड त्याने फाडले. मग मी कसे काय शांत बसू? असा उलटप्रश्न मनोज जरांगे यांनी केला आहे. 

मी काही बोललो नव्हतो, तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला? 

मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील टीका एकेरीवर आल्याचे दिसत आहे. मी २०-२५ दिवस गप्प बसलो होतो. मी काही बोललो नव्हतो. तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला? वय झाले आहे त्यामुळे माणसाला पचत नाही. खायची सवय लागली आहे. महाराष्ट्र सदन, जनतेचा पैसा सगळे ओरबाडून खाल्ले आहे. अजित पवार यांनाही सांगतो आहे जर ते शांत बसले नाही तर मी शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माझे हेच सांगणे आहे. कायदा पाळणे हे त्यांचेही काम आहे. कार्यकर्त्यांना सांगून आमचे बोर्ड फाडणे बंद करायला सांगा, अशी तंबी मनोज जरांगे यांनी दिली.

दरम्यान, ओबीसीमधील सामान्य लोकांना वाटते की, पुरावे मिळाले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसले पाहिजे. हा खातो किती? याला पुरेनाच. अरे किती खातो? अनेक दिवसांपासून एकटाच खातो आहे. मुकादम चांगला नाही, त्याला घरी बसवणार आहे, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण