शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

“टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 10:28 IST

Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: अजित पवारांना सांगतो की, ते शांत बसले नाही तर मीही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढताना दिसत आहे. ही टीका अधिकाधिक वैयक्तिक होताना पाहायला मिळत आहे. यातच आता, अजित पवारांना सांगणे आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही. टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी खूप गडबड चालू आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा नाव न घेता हल्लाबोल केला.

मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी जाऊन भेटी-गाठी घेत आहेत. मनोज जरांगे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातच छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेतून मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांनीही शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांमधील वाद वाढताना दिसत आहे. एका बैठकीत ठरले. सगळ्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की, जातीय तणाव निर्माण व्हायला नको. फक्त मनोज जरांगे पाटील यांनी कुणाचा एकेरी उल्लेख करु नये. मी शांत बसलो होतो तेव्हा येवल्यातील बोर्ड त्याने फाडले. मग मी कसे काय शांत बसू? असा उलटप्रश्न मनोज जरांगे यांनी केला आहे. 

मी काही बोललो नव्हतो, तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला? 

मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील टीका एकेरीवर आल्याचे दिसत आहे. मी २०-२५ दिवस गप्प बसलो होतो. मी काही बोललो नव्हतो. तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला? वय झाले आहे त्यामुळे माणसाला पचत नाही. खायची सवय लागली आहे. महाराष्ट्र सदन, जनतेचा पैसा सगळे ओरबाडून खाल्ले आहे. अजित पवार यांनाही सांगतो आहे जर ते शांत बसले नाही तर मी शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माझे हेच सांगणे आहे. कायदा पाळणे हे त्यांचेही काम आहे. कार्यकर्त्यांना सांगून आमचे बोर्ड फाडणे बंद करायला सांगा, अशी तंबी मनोज जरांगे यांनी दिली.

दरम्यान, ओबीसीमधील सामान्य लोकांना वाटते की, पुरावे मिळाले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसले पाहिजे. हा खातो किती? याला पुरेनाच. अरे किती खातो? अनेक दिवसांपासून एकटाच खातो आहे. मुकादम चांगला नाही, त्याला घरी बसवणार आहे, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण