शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 10:54 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू केले आहे. सरकारला दिलेला वेळ आता संपत आला असून जरांगे पाटील मुंबईत आंदोलनसाठी जाणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आरक्षण जाहीर झाले तरी आम्ही मुंबईला जाणारच अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथून मुंबईसाठी निघणार आहेत.या आधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते मराठा आरक्षणाबाबत बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मुंबईला निघणार; पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

"माझ मराठ्यांना शेवटच सांगणे आहे मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, मराठ्यांची एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुल संपली पाहिजेत अस त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगे पाटील भावूक झाले होते. 

"मी समाजाला न्याय दिला पाहिजे, समाजात असेन नसेन याचे मला दु:ख होत आहे.मी समाज सुद्धा बघायला पाहिजे. या उपोषणामुळे मला शरीर जास्त साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची आहे. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे मराठ्यांची  मुल मोठी व्हावीत म्हणून मुंबईकडे निघालो आहे. मी तुमच्यात असेल नसेल हा विचार संपवू द्यायचा नाही. हे आंदोलन बंद पडू द्यायचे नाही, आथा आरक्षण घेऊन मुलांचे डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.  

मुंबईपर्यंत पायी चालत जाणार 

अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे. मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकत? शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे मी रात्रीपासून व्यथीत झालो अस म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. आपले लेकरं मेले आहेत. आता ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंआहे. त्यामुळं मी आता अंतरवालीतूनचं आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे, असं जरांगे पाटलांनी म्हंटल आहे. या मोर्चादरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण