शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 13:52 IST

Manoj Jarange Patil News: अजित पवारांचे काही पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. २० तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: एक महिना झाला. वेळ संपला. मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, असे आवाहन सरकारला करतानाच मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू, अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केली. यानंतर आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचे नाव घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आरोप केले आहेत.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. दिलेल्या मुदतीत आरक्षण न मिळाल्यास त्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे, असे कधीही म्हटले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत

आम्हाला जे काही दिसत आहे, त्यावर काम करणे गरजेचे आहे. मला आमचा समाज महत्त्वाचा आहे. एक महिन्याचा वेळ दिला होता. या महिन्यात काय केले, हे आमच्या लक्षात आले आहे. आम्हाल १३ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही, हेच दिसत आहे. आम्ही संयम बाळगला आहे. जर तसे नसते, तर शंभुराज देसाईंचा शब्द पाळला नसता. देवेंद्र फडणवीस करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील. कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत, या शब्दांत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला. १३ तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आता कसे मिळवायचे ते आम्ही पाहतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

दरम्यान, मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचा उदोउदो करायचा, हे चुकीचे आहे. समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. २० तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असणार आहे. गेले दहा ते अकरा महिने आम्ही संयमाने घेत आहोत. पण त्याचे परिणाम दिसत आहेत. मी उपोषण करावे, अशी समाजाची इच्छा नाही, पण मी त्यांचे मन बदलेन. समाजासाठी बलिदान देण्यास तयार आहे. समाज मोठा झाला पाहिजे. समाज सुखी झाला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण