शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 13:52 IST

Manoj Jarange Patil News: अजित पवारांचे काही पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. २० तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: एक महिना झाला. वेळ संपला. मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, असे आवाहन सरकारला करतानाच मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू, अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केली. यानंतर आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचे नाव घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आरोप केले आहेत.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. दिलेल्या मुदतीत आरक्षण न मिळाल्यास त्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे, असे कधीही म्हटले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत

आम्हाला जे काही दिसत आहे, त्यावर काम करणे गरजेचे आहे. मला आमचा समाज महत्त्वाचा आहे. एक महिन्याचा वेळ दिला होता. या महिन्यात काय केले, हे आमच्या लक्षात आले आहे. आम्हाल १३ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही, हेच दिसत आहे. आम्ही संयम बाळगला आहे. जर तसे नसते, तर शंभुराज देसाईंचा शब्द पाळला नसता. देवेंद्र फडणवीस करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील. कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत, या शब्दांत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला. १३ तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आता कसे मिळवायचे ते आम्ही पाहतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

दरम्यान, मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचा उदोउदो करायचा, हे चुकीचे आहे. समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. २० तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असणार आहे. गेले दहा ते अकरा महिने आम्ही संयमाने घेत आहोत. पण त्याचे परिणाम दिसत आहेत. मी उपोषण करावे, अशी समाजाची इच्छा नाही, पण मी त्यांचे मन बदलेन. समाजासाठी बलिदान देण्यास तयार आहे. समाज मोठा झाला पाहिजे. समाज सुखी झाला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण