शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:21 IST

Manisha Kayande on Eknath Shinde: शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.

काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागची दोन कारणे सांगितले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजनेमुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले, असे त्या म्हणाल्या.

एका कार्यक्रमात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही मुख्यमंत्र्यांची चर्चा होते, तेव्हा फक्त एकनाथ शिंदे यांचाच चेहरा समोर येतो. एकनाथ शिंदे हे आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी शिवसैनिकांसाठी मुख्यमंत्रीच आहेत आणि कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही."

पुढे बोलताना मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागचे दोन कारण सांगितले आहेत. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना यांनी महायुतीच्या विजयाच्या मोलाची भूमिका बजावली, असे मत त्यांनी व्यक्त केले. "एकनाथ शिंदे केवळ भाषणच देत नाही तर चांगली कामगिरीही करतात. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत", असे त्या म्हणाल्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या २३० जागांमध्ये भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागांवर विजय मिळवण्यात यश आले. तर काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण