शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:21 IST

Manisha Kayande on Eknath Shinde: शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.

काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागची दोन कारणे सांगितले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजनेमुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले, असे त्या म्हणाल्या.

एका कार्यक्रमात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही मुख्यमंत्र्यांची चर्चा होते, तेव्हा फक्त एकनाथ शिंदे यांचाच चेहरा समोर येतो. एकनाथ शिंदे हे आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी शिवसैनिकांसाठी मुख्यमंत्रीच आहेत आणि कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही."

पुढे बोलताना मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागचे दोन कारण सांगितले आहेत. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना यांनी महायुतीच्या विजयाच्या मोलाची भूमिका बजावली, असे मत त्यांनी व्यक्त केले. "एकनाथ शिंदे केवळ भाषणच देत नाही तर चांगली कामगिरीही करतात. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत", असे त्या म्हणाल्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या २३० जागांमध्ये भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागांवर विजय मिळवण्यात यश आले. तर काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण