शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यातील ११ शहरांत होणार आंबा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 6:29 AM

पणन मंडळाचा उपक्रम : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी प्रयत्नशील

रत्नागिरी : ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी पणन मंडळातर्फे दरवर्षी राज्यातील विविध शहरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा प्राप्त होतोच, शिवाय हमाली, दलालीची कटकट न राहता शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसेही मिळतात. पणन मंडळाने यावर्षीही राज्यातील अकरा मोठ्या शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यंदा रत्नागिरीतील १२५ आंबा उत्पादकांनी पणनकडे स्टॉलची मागणी केली असून, यातील ६० शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. पणन मंडळाने राज्यातील ११ प्रमुख शहरांमध्ये थेट विक्री स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. ‘उत्पादक ते ग्राहक’ अशी साखळी निर्माण करण्यासाठी थेट विक्रीचा हा उपाय शेतकºयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

विक्रेत्यांना सुविधा पुरविणारपुणे, नाशिक, कोथरूड, इंदोर, पनवेल, भिवंडी, वसई, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रींतर्गत शेतकºयांना संधी प्राप्त होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. पर्यटकांना खात्रीशीर व दर्जेदार आंबा मिळावा, यासाठी बाजार समितीच्या मदतीने आंबा उत्पादकांना स्टॉल्स दिले जाणार आहेत. शेतकºयाच्या शेतमाल विक्रीकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच थेट ग्राहकांना विक्रीबाबतच्या आवश्यक सुविधा उभारण्यावर पणन मंडळाने भर दिला आहे. आंबा विक्रीकरिता पुणे, मुंबई शिवाय राज्यातील अन्य शहरांमध्ये, तसेच परराज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे.