शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 12:44 IST

नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) मर्यादेच्या बाहेर गेले की करेक्ट कार्यक्रम कुणाचा होतो हे जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, तसं जनतासुद्धा मर्यादेबाहेर गेलेल्या लोकांचा कार्यक्रम २०२४ च्या निवडणुकीत करणार आहे. या राज्यात सगळ्याच गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या आहेत. तुम्हीच एखाद्याला उभं करायचे आणि मर्यादेबाहेर गेल्यावर करेक्ट कार्यक्रमाची भाषा करायची. पण आम्हाला या सर्व विषयांत पडायचं नाही. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलेत. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ बिघडता कामा नये. पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लागू नये. महाराष्ट्रात भाषा बिघडलेली आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर राज्याची भाषा आणि संस्कृती पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली. जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांबाबत वापरली त्याचे कुणीही समर्थन करणार नाही पण भाजपाचे काही भाडोत्री लोक विरोधी पक्षातील नेत्यांबाबत ज्या भाषेचा प्रयोग करतात त्याचे समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रम करणारे करणार आहेत का असा सवालही त्यांनी विचारला. 

तसेच तुम्ही हवी ती भाषा वापरायची आणि तुमच्यावर कुणी अशा भाषा वापरली तर तुम्हाला ती टोचते. नारायण राणे आणि त्यांची मुले कुठली भाषा वापरतात? भाजपा आणि शिंदे गँगचे काही लोक कुठल्या प्रकारची भाषा वापरतात, आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन करावे. त्यातून मराठी भाषा शुद्ध होईल. टीका आम्हीही करतो, प्रखर करतो, आम्ही व्यक्तिगत टीका करत नाही. राजकीय भूमिकांवर टीका करतो. नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, राज्य कायद्याचे आहे. सरकारवर वाटत असेल एखाद्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होतंय तर सरकारला कारवाईचा अधिकार आहे. पण ही वेळ महाराष्ट्रावर कुणी आणि का आणली? याची चौकशी केली पाहिजे. आजही मराठा समाजाला आपली फसवणूक झालीय असं का वाटते? त्यातून हा उद्रेक सुरू असेल, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात जातीजातीत आग लावण्याचं काम कुणी केले, हे राज्य आधी कधी असं नव्हते. हे भाजपाचे राजकारण आहे. महाराष्ट्रात जातीजातीत, पोटजातीत इतका कधीच दुभंगला नव्हता अशी टीकाही संजय राऊतांनी भाजपावर केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण