शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निसर्गाने दिलेले ऑक्सिजन प्लांट माणूस करतोय नष्ट, मुख्यमंत्री ठाकरे यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 05:37 IST

Chief Minister Uddhav Thackeray : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले, पण आपण निसर्गाने वृक्षांच्या रूपाने दिलेले ऑक्सिजन प्लांट नष्ट करत आहोत. वनांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यावर हुकूमत गाजवत आहोत अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वनविभागाच्या बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र या कॉफीटेबलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.विकास कामांचे नियोजन हे निसर्गाचे नियम समजून करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बीएचके, टु बीएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. विकासाचा हा असा हव्यास आपल्या जीवनाला घातक ठरत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरण रक्षणाच्या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी सातत्य ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अमृत शहरांत ठाण्याची बाजीअमृत शहरे गटामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ हा पुणे महापालिकेने तर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ हा नाशिक महापालिका आणि बार्शी नगरपरिषद (जि. सोलापूर) यांना विभागून प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे