शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Shivaji Maharaj Statue Collapse मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:14 IST

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली तिथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला.

शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यात संतापाची लाट आहे. तसेच सर्वपक्षीय नेते दुर्घटनास्थळी भेट देऊन  पाहणी करत आहेत. दरम्यान, मालवणमधील ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली तिथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला. राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आज आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीचे नेते आले होते. त्याचवेळी स्थानिक खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचले होते. यादरम्यान, दोन्ही गट किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि वादाची ठिकणी पडली. 

राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. तसेच किल्ल्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असताना भाजपा नेते निलेश राणे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. तर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केली.

दरम्यान, राजकोट किल्ल्यामध्ये भेट देत असताना भाजपा नेते नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट झाली होती. तसेच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केले होते. त्यानंतर नारायण राणे गडावर पाहणीसाठी पोहोचले. मात्र काही वेळात आदित्य ठाकरे यांचंही राजकोट किल्ल्याच्या परिसरात आगमन झालं. त्यानंतर राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली. तर आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका घेतली. तर १५ मिनिटांत वाट मोकळी केली नाही तर आम्ही किल्ल्यात घुसू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. मात्र घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण अधिकच चिघळलं. दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू असताना जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज