शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटात सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:01 IST

‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’चा अहवाल : १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू हिंसाचार आणि आत्महत्येमुळे

मुंबई : कुपोषणावरील उपाय महत्त्वाचे आहेतच, पण त्याला आळा घालण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’च्या अहवालानुसार राज्यात कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण ४५.४ टक्के आहे. याखालोखाल अतिसार, श्वसनविकार या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

गर्भधारणेपासून ते मूल दोन वर्षांचे होईपर्यंतचा हजार दिवसांचा काळ हा मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात पुरेसे पोषण मिळाल्यास मूल भविष्यात एक निरोगी आयुष्य जगू शकते व पिढ्यान्पिढ्या चालू असलेले गरिबीचे चक्र भेदण्याच्या कामी त्याचा हातभार लागण्याची शक्यता वाढते. गर्भामध्ये व बाल्यावस्थेमध्ये होणाऱ्या कुपोषणाकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश सरदेसाई यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, या अहवालानुसार १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण हिंसाचार आणि आत्महत्या आहे. याचे प्रमाण १६.२ असून त्याखालोखाल १३.९ टक्के तरुणाई कर्करोगामुळे मृत्यू पावते, असे निरीक्षण मांडले आहे.

याविषयी मानसोपचारतज्ज्ञडॉ. सुनंदा शाह यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार तरुण पिढीला होत आहेत. त्यात स्पर्धात्मक युगामुळे ताणतणावातही भर पडतेय. दिवसभर काबाडकष्ट करूनदेखील तुमच्या हातात काहीच पडत नसेल तर ही गोष्ट कोणाला सांगता येत नाही. आपल्याला कोणी याबाबत मदतही करू शकणार नाही, अशी भावना मनात तयार होत असल्याने तणावग्रस्त होऊन लोक स्वत:चे जीवन संपवतात. मात्र याला आळा घालण्यासाठी संवाद, सकारात्मक वातावरण, आवडीचा छंद अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्याची अधिक गरज आहे.महिला-पुरुषांमध्ये लोहाची कमतरताअहवालानुसार, महिला व पुरुषांमध्ये लोहाची कमतरता कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ऐकणे-दृष्टीची क्षमता हरविणे, पाठीचे दुखणे आणि मायग्रेन अशा समस्या अधिकाधिक उद्भवत असल्याचे निरीक्षण मांडले आहे. याखेरीज, वैद्यकीय तज्ज्ञांनी सामान्यांनी आरोग्याकडे अधिकाधिक गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू