शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटात सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:01 IST

‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’चा अहवाल : १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू हिंसाचार आणि आत्महत्येमुळे

मुंबई : कुपोषणावरील उपाय महत्त्वाचे आहेतच, पण त्याला आळा घालण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ‘इंडिया : हेल्थ आॅफ नेशन स्टेट’च्या अहवालानुसार राज्यात कुपोषणामुळे शून्य ते १४ वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण ४५.४ टक्के आहे. याखालोखाल अतिसार, श्वसनविकार या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

गर्भधारणेपासून ते मूल दोन वर्षांचे होईपर्यंतचा हजार दिवसांचा काळ हा मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात पुरेसे पोषण मिळाल्यास मूल भविष्यात एक निरोगी आयुष्य जगू शकते व पिढ्यान्पिढ्या चालू असलेले गरिबीचे चक्र भेदण्याच्या कामी त्याचा हातभार लागण्याची शक्यता वाढते. गर्भामध्ये व बाल्यावस्थेमध्ये होणाऱ्या कुपोषणाकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश सरदेसाई यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, या अहवालानुसार १५ ते ३९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण हिंसाचार आणि आत्महत्या आहे. याचे प्रमाण १६.२ असून त्याखालोखाल १३.९ टक्के तरुणाई कर्करोगामुळे मृत्यू पावते, असे निरीक्षण मांडले आहे.

याविषयी मानसोपचारतज्ज्ञडॉ. सुनंदा शाह यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार तरुण पिढीला होत आहेत. त्यात स्पर्धात्मक युगामुळे ताणतणावातही भर पडतेय. दिवसभर काबाडकष्ट करूनदेखील तुमच्या हातात काहीच पडत नसेल तर ही गोष्ट कोणाला सांगता येत नाही. आपल्याला कोणी याबाबत मदतही करू शकणार नाही, अशी भावना मनात तयार होत असल्याने तणावग्रस्त होऊन लोक स्वत:चे जीवन संपवतात. मात्र याला आळा घालण्यासाठी संवाद, सकारात्मक वातावरण, आवडीचा छंद अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण करण्याची अधिक गरज आहे.महिला-पुरुषांमध्ये लोहाची कमतरताअहवालानुसार, महिला व पुरुषांमध्ये लोहाची कमतरता कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ऐकणे-दृष्टीची क्षमता हरविणे, पाठीचे दुखणे आणि मायग्रेन अशा समस्या अधिकाधिक उद्भवत असल्याचे निरीक्षण मांडले आहे. याखेरीज, वैद्यकीय तज्ज्ञांनी सामान्यांनी आरोग्याकडे अधिकाधिक गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू