शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मालेगाव स्फोट; आठ आरोपमुक्त

By admin | Updated: April 26, 2016 06:30 IST

मालेगाव २००६ मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केले.

मुंबई : मालेगाव २००६ मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केले. विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) व सीबीआयला मोठा दणका बसला आहे. या स्फोटात ३७ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. मालेगावात २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील नऊ आरोपींनी स्वामी असीमानंद यांनी राष्ट्रीय तपास पथकाकडे दिलेल्या कबुलीजबाबानंतर विशेष मोक्का न्यायालयात आरोप मुक्ततेसाठी अर्ज केला. स्वामी असीमानंद यांच्या कबुलीजबाबानुसार, मालेगाव २००६ चा बॉम्बस्फोट कट्टर उजव्या विचारसरणीची संघटना ‘अभिनव भारत’ने घडवून आणला. एनआयएनेही मालेगाव २००६ व २००८ च्या बॉम्बस्फोटासाठी ‘अभिनव भारत’ला जबाबदार धरले आहे.पाच वर्षांच्या कारावासानंतर या सर्व आरोपींनी आरोपमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला. तसेच २०११ मध्ये जामिनासाठी अर्जही केला. त्यांच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. सोमावरी विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी या सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. नऊपैकी सहा आरोपी कायमचे कारागृहाबाहेर आले. तर दोन आरोपींना मुंबईच्या लोकल बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर एकाचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला आहे.नुरुल हुडा समसुदोहा, रईस अहमद रज्जब अली, सलमान फर्सी, फारोघ इक्बाल मगदुमी, शेख मोहम्मद अली अलाम शेख, असीफ खान बशीर खान, अब्रार अहमद गुलाम अहमद, मोहम्मद झहीद अब्दुल माजीद अशी या आठ जणांची नावे असून, शब्बीर अहमद मशीउल्ला याचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला आहे. हे सर्व बंदी घातलेल्या सिमीचे सदस्य आहेत आणि त्यांनी बॉम्बस्फोटासाठी पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर - ए - तोयबाची मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. - आणखी वृत्त/१२>प्रकरण काय ? ८ सप्टेंबर २००६ रोजी या नऊ जणांनी कट रचत नाशिकमधील मालेगावसारख्या संवेदनशील भागात तीन बॉम्बस्फोट केले. गर्दी असलेला बाजार, दफनभूमी आणि शब्बे- बरातच्यावेळी मशिदीमध्ये बॉम्बस्फोट केला. या बॉम्बस्फोटांत ३७ जणांचा मृत्यू झाला, तर १०० लोक जखमी झाली. हे होते आरोप : आयपीसी कलम ३२४, ३२५, ३२६, १२१ (ए) आणि १२० (बी) तर आरोपींवर एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याशिवाय मोक्का व बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवला होता.