शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:15 IST

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे.

ठळक मुद्देअंतराळ संशोधन मोहिमेत कंपनीचा मोलाचा वाटा इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर केले विकसित या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश

- निनाद देशमुख

पुणे : चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी  १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार असून त्याला अवकाशात झेपावण्यासाठी लागणारे बूस्टरचे केसिंग इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे. या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.

अवकाश मोहिमांत विविध विक्रम प्रस्थापित करून इस्रोने देशाचे नाव मोजक्या देशांच्या यादीत नेले आहे. गेल्या दशकात अनेक अंतराळ मोहिमा आखत देशाचा लौकिक वाढविला आहे. या मोहिमांसाठी लागणारी महत्त्वाची प्रणाली बनविण्याची जबाबदारी  इस्रोेच्या शास्त्रज्ञांनी वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. ही जबाबदारी या कंपनीच्या अभियंत्यांनी लीलयापार पाडली आहे. चांद्रयान १ मोहिमेबरोबरच मंगळ यान मोहिम तसेच एकाच वेळी १०० पेक्षा अधिक उपग्रह सोडण्यासाठी पहिल्या स्टेजमधील महत्त्वाची बूस्टर केसिंग वालचंदनगर कंपनीच्या अभियंत्यांनी बनविली आहे.

कंपनीने यासाठी खास व्यवस्था केली आहे. यासाठी लागणारे पोलाद इस्रोने उपलब्ध करून दिले आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचे अत्यंत अवघड काम वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये करण्यात आले. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे पीएसएव्ही आणि जीएसएलव्ही मार्क ३ ही प्रक्षेपास्त्र आहेत. ते अवकाशात पाठविण्यासाठी बूस्टर गरजेचे असते. 

काय आहे बूस्टर प्रणालीकुठल्याही प्रक्षेपास्त्राला अंतराळात झेपावण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये बूस्टर प्रणाली महत्वाची असते. या बुस्टरमध्ये घनरूपातील इंधन असते. या इंधनाच्या जोरावर प्रक्षेपास्त्र अवकाशात पाठविले जाते. प्रक्षेपास्त्राला हवेत दिशा देण्यासाठी लागणारी ‘एस २०० फ्लेक्स नॉझल कंट्रोल टँकेज’ यंत्रणाही वालचंदनगर इंडस्ट्रीतील अभियंत्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने विकसित केली आहे. संरक्षण सिद्धतेत देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोलाचे योगदान भारताच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात परदेशातून शस्त्रास्त्र आयात केली जातात. मात्र, संरक्षण सिद्धतेत देश स्वयंपूर्ण व्हावा, या हेतून अनेक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून वालचंदनगर इंडस्ट्रीद्वारे ती विकसित करण्यात येत आहे. देश स्वयंपूर्ण व्हावा या एकमेव उद्देशाने वालचंद हिराचंद यांनी विमान, जहाजे व मोटारी या क्षेत्रात पाय रोवले. आज अवकाश तंत्रज्ञानाबरोबर अणुतंत्रज्ञानातही वालचंद इंडस्ट्रीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

अंतराळ क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ मोलाची कामगिरी करत आहेत. अंतराळ मोहिमेसाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रणाली वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविल्या जात आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. - जी. के. पिल्लई व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर इंडस्ट्रीज. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो