शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:15 IST

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे.

ठळक मुद्देअंतराळ संशोधन मोहिमेत कंपनीचा मोलाचा वाटा इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर केले विकसित या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश

- निनाद देशमुख

पुणे : चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी  १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार असून त्याला अवकाशात झेपावण्यासाठी लागणारे बूस्टरचे केसिंग इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे. या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.

अवकाश मोहिमांत विविध विक्रम प्रस्थापित करून इस्रोने देशाचे नाव मोजक्या देशांच्या यादीत नेले आहे. गेल्या दशकात अनेक अंतराळ मोहिमा आखत देशाचा लौकिक वाढविला आहे. या मोहिमांसाठी लागणारी महत्त्वाची प्रणाली बनविण्याची जबाबदारी  इस्रोेच्या शास्त्रज्ञांनी वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. ही जबाबदारी या कंपनीच्या अभियंत्यांनी लीलयापार पाडली आहे. चांद्रयान १ मोहिमेबरोबरच मंगळ यान मोहिम तसेच एकाच वेळी १०० पेक्षा अधिक उपग्रह सोडण्यासाठी पहिल्या स्टेजमधील महत्त्वाची बूस्टर केसिंग वालचंदनगर कंपनीच्या अभियंत्यांनी बनविली आहे.

कंपनीने यासाठी खास व्यवस्था केली आहे. यासाठी लागणारे पोलाद इस्रोने उपलब्ध करून दिले आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचे अत्यंत अवघड काम वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये करण्यात आले. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे पीएसएव्ही आणि जीएसएलव्ही मार्क ३ ही प्रक्षेपास्त्र आहेत. ते अवकाशात पाठविण्यासाठी बूस्टर गरजेचे असते. 

काय आहे बूस्टर प्रणालीकुठल्याही प्रक्षेपास्त्राला अंतराळात झेपावण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये बूस्टर प्रणाली महत्वाची असते. या बुस्टरमध्ये घनरूपातील इंधन असते. या इंधनाच्या जोरावर प्रक्षेपास्त्र अवकाशात पाठविले जाते. प्रक्षेपास्त्राला हवेत दिशा देण्यासाठी लागणारी ‘एस २०० फ्लेक्स नॉझल कंट्रोल टँकेज’ यंत्रणाही वालचंदनगर इंडस्ट्रीतील अभियंत्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने विकसित केली आहे. संरक्षण सिद्धतेत देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोलाचे योगदान भारताच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात परदेशातून शस्त्रास्त्र आयात केली जातात. मात्र, संरक्षण सिद्धतेत देश स्वयंपूर्ण व्हावा, या हेतून अनेक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून वालचंदनगर इंडस्ट्रीद्वारे ती विकसित करण्यात येत आहे. देश स्वयंपूर्ण व्हावा या एकमेव उद्देशाने वालचंद हिराचंद यांनी विमान, जहाजे व मोटारी या क्षेत्रात पाय रोवले. आज अवकाश तंत्रज्ञानाबरोबर अणुतंत्रज्ञानातही वालचंद इंडस्ट्रीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

अंतराळ क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ मोलाची कामगिरी करत आहेत. अंतराळ मोहिमेसाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रणाली वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविल्या जात आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. - जी. के. पिल्लई व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर इंडस्ट्रीज. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो