शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

इथेनॉलनिर्मिती करा, जादा साखर विका; साखर कारखान्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:25 AM

साखरेचा साठा कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : बी हेवी मोलॅसिसपासून किंवा उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करा आणि जादा साखर विका, असा आदेश केंद्राने साखर कारखान्यांना दिला आहे. देशातील साखरेचा साठा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहेत. आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामासाठी हा आदेश लागू होणार आहे.गरज २६० लाख टनांची असताना देशात चालू साखर हंगामात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीला सुमारे १०० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. शिवाय नव्या हंगामात ३५० लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. यामुळे नव्या हंगामातही शिल्लक साखरेचा प्रश्न भेडसावणार आहे. यामुळे सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचे दर १० ते २५ टक्क्यांनी वाढविले आहेत. सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलला प्रतिलिटर ४३ रुपये ४६ पैसे, बी हेवीपासूनच्या इथेनॉलला ५२ रुपये ४३ पैसे, तर उसाच्या रसापासून थेट तयार होणाºया इथेनॉलला ५९ रुपये १३ पैसे असे दर निश्चित केले आहेत. या धोरणाचाच पुढचा भाग म्हणून बी हेवीपासून तसेच उसापासून थेट इथेनॉल निर्मिती केल्यास जेवढा ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविला जाईल आणि त्यापासून जेवढी साखर निर्मिती झाली असेल तेवढी साखर खुल्या बाजारात विक्रीला कारखान्याला परवानगी देण्यात आली आहे.असे असेल प्रमाणएक टन साखर निर्मिती म्हणजेच ६०० लिटर इथेनॉल असे प्रमाण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. म्हणजेच १० टक्के उतारा गृहीत धरला तर प्रतिक्विंटल ६० किलो साखर विकता येऊ शकेल. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्याव्यतिरिक्त खुल्या बाजारात विकता येणारी ही जादा साखर असणार आहे.शिल्लक साखरेचा साठा कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा चांगला निर्णय आहे. देशाची जेवढी गरज आहे तेवढीच साखर निर्मिती करून उर्वरित ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याचा भविष्यात हा कायमस्वरुपी पर्याय ठरु शकतो. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने