शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
5
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
6
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
7
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
8
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
9
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
10
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
11
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
12
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
13
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
14
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
16
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
17
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
18
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
19
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
20
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:10 IST

काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.

नांदेड - काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. १ व २ मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तरोडा येथील भवानी चौकात रविवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप, मा. आ. कल्याण काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, संतोष पांडागळे व दोन्ही प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, शहराचा विकास काँग्रेसच्या कार्यकाळातच झाला आहे. गुरु-ता-गद्दी तसेच नांदेड शहराचा जेएनयूआरएम योजनेत समावेश झाल्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अडीच हजार कोटींचा निधी दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरातील बाह्य वळण रस्ते, उड्डाणपूल, जलकुंभ, स्टेडियम, विमानतळ, झोपडपट्टी वासियांना पक्की घरे यासह अन्य विकासकामे करण्यात आली. यामुळे शहराचा ख-या अर्थाने विकास झाला आहे.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात शहरासाठी कोणताही विकास निधी दिला नाही. स्मार्ट सिटी योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर नांदेड शहराचा या योजनेत समावेश केला नाही. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली मात्र गेल्या दोन वर्षात फक्त सहा लाख युवकांनाच रोजगार मिळाला. नोटाबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला असून, अनेकांचा रांगेत मृत्यू झाला. रेशनिंगवर मिळणारी साखर भाजप सरकारने बंद केली. गोरक्षणाच्या नावाखाली दलित अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या हत्या सुरू आहेत. या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून, भाजपा सरकारच्या परतीच्या प्रवासास नांदेडातून सुरुवात करा असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी मतदारांना केले.   यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड,  माजी मंत्री रमेश बागवे, आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप मा. आ. कल्याण काळे, यांनीही भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली काँग्रेस तसेच खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातच नांदेडचा विकास होऊ शकतो यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. या प्रचारसभेस प्रभाग क्र.१ व २ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण