शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:10 IST

काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.

नांदेड - काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. १ व २ मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तरोडा येथील भवानी चौकात रविवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप, मा. आ. कल्याण काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, संतोष पांडागळे व दोन्ही प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, शहराचा विकास काँग्रेसच्या कार्यकाळातच झाला आहे. गुरु-ता-गद्दी तसेच नांदेड शहराचा जेएनयूआरएम योजनेत समावेश झाल्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अडीच हजार कोटींचा निधी दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरातील बाह्य वळण रस्ते, उड्डाणपूल, जलकुंभ, स्टेडियम, विमानतळ, झोपडपट्टी वासियांना पक्की घरे यासह अन्य विकासकामे करण्यात आली. यामुळे शहराचा ख-या अर्थाने विकास झाला आहे.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात शहरासाठी कोणताही विकास निधी दिला नाही. स्मार्ट सिटी योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर नांदेड शहराचा या योजनेत समावेश केला नाही. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली मात्र गेल्या दोन वर्षात फक्त सहा लाख युवकांनाच रोजगार मिळाला. नोटाबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला असून, अनेकांचा रांगेत मृत्यू झाला. रेशनिंगवर मिळणारी साखर भाजप सरकारने बंद केली. गोरक्षणाच्या नावाखाली दलित अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या हत्या सुरू आहेत. या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून, भाजपा सरकारच्या परतीच्या प्रवासास नांदेडातून सुरुवात करा असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी मतदारांना केले.   यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड,  माजी मंत्री रमेश बागवे, आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप मा. आ. कल्याण काळे, यांनीही भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली काँग्रेस तसेच खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातच नांदेडचा विकास होऊ शकतो यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. या प्रचारसभेस प्रभाग क्र.१ व २ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण