शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भात नुकसान भरपाई निकषात बदल करा, नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:43 IST

अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.

 कणकवली - अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. तसेच त्याना मागण्यांचे निवेदन दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेर पासून दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी भात शेतीचे नुकसान होते. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या अटी व निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात मुख्य पिक असलेल्या भातशेती खालील क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे.यावर्षी 63000 हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येणे अपेक्षित असताना फक्त 53,320 हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेतीची लागवड करण्यात आली. म्हणजे सुमारे 10000 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. असेच यापुढेही चालु राहिल्यास शेतकरी भविष्यात भाताचे पिक घेणे बंद करतील की काय?असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिति निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या शेतीला द्यायच्या नुकसान भरपाईबाबतच्या निकषानुसार एकाच दिवशी 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद ज्या गावामध्ये होते त्याठिकाणी 16000 रूपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परन्तु सध्या कोकणात पडणारा पाऊस हा एकाच दिवशी 65 मिमी न पड़ता दरदिवशी 25 ते 30 मिमी पड़त आहे. त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही.त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी एका दिवसात 65 मिमी पाऊसा ऐवजी सलग तिन दिवस पडणाऱ्या पावसाची नोंद 65 मिमी पेक्षा अधिक असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,असा सुधारित निर्णय व्हावा. अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitesh Raneनीतेश राणे