शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भात नुकसान भरपाई निकषात बदल करा, नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:43 IST

अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.

 कणकवली - अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. तसेच त्याना मागण्यांचे निवेदन दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेर पासून दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी भात शेतीचे नुकसान होते. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या अटी व निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात मुख्य पिक असलेल्या भातशेती खालील क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे.यावर्षी 63000 हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येणे अपेक्षित असताना फक्त 53,320 हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेतीची लागवड करण्यात आली. म्हणजे सुमारे 10000 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. असेच यापुढेही चालु राहिल्यास शेतकरी भविष्यात भाताचे पिक घेणे बंद करतील की काय?असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिति निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या शेतीला द्यायच्या नुकसान भरपाईबाबतच्या निकषानुसार एकाच दिवशी 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद ज्या गावामध्ये होते त्याठिकाणी 16000 रूपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परन्तु सध्या कोकणात पडणारा पाऊस हा एकाच दिवशी 65 मिमी न पड़ता दरदिवशी 25 ते 30 मिमी पड़त आहे. त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही.त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी एका दिवसात 65 मिमी पाऊसा ऐवजी सलग तिन दिवस पडणाऱ्या पावसाची नोंद 65 मिमी पेक्षा अधिक असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,असा सुधारित निर्णय व्हावा. अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitesh Raneनीतेश राणे