शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भात नुकसान भरपाई निकषात बदल करा, नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:43 IST

अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.

 कणकवली - अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. तसेच त्याना मागण्यांचे निवेदन दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेर पासून दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी भात शेतीचे नुकसान होते. मात्र, शासनाच्या नुकसान भरपाईच्या अटी व निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात मुख्य पिक असलेल्या भातशेती खालील क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे.यावर्षी 63000 हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येणे अपेक्षित असताना फक्त 53,320 हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेतीची लागवड करण्यात आली. म्हणजे सुमारे 10000 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. असेच यापुढेही चालु राहिल्यास शेतकरी भविष्यात भाताचे पिक घेणे बंद करतील की काय?असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिति निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या शेतीला द्यायच्या नुकसान भरपाईबाबतच्या निकषानुसार एकाच दिवशी 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद ज्या गावामध्ये होते त्याठिकाणी 16000 रूपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परन्तु सध्या कोकणात पडणारा पाऊस हा एकाच दिवशी 65 मिमी न पड़ता दरदिवशी 25 ते 30 मिमी पड़त आहे. त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही.त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी एका दिवसात 65 मिमी पाऊसा ऐवजी सलग तिन दिवस पडणाऱ्या पावसाची नोंद 65 मिमी पेक्षा अधिक असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,असा सुधारित निर्णय व्हावा. अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitesh Raneनीतेश राणे