शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

झगडून घेतलेली जागा राखताना शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 06:00 IST

हा मतदारसंघ आधीचा डहाणू. पुनर्रचनेत तो पालघर या नावाने अस्तित्वात आला. सुरुवातीपासून हा परिसर भाजपाचा-खासकरून संघ परिवाराचा प्रभाव राखणारा होता.

युती करताना भारतीय जनता पार्टीशी झगडून मिळवलेला पालघर मतदारसंघ राखण्यास शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ठाण्याप्रमाणेच भाजपाचा प्रभाव असलेला हाही मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागल्याने भाजपासह संघ परिवारात प्रचंड नाराजी आहे. ती गृहीत धरूनच शिवसेनेला येथे लढत द्यावी लागेल. ही नाराजी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

हा मतदारसंघ आधीचा डहाणू. पुनर्रचनेत तो पालघर या नावाने अस्तित्वात आला. सुरुवातीपासून हा परिसर भाजपाचा-खासकरून संघ परिवाराचा प्रभाव राखणारा होता. इथे संघाने अनेक वर्षांच्या अथक मेहनतीने वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चांगले नेटवर्क तयार केले आहे. तेथे त्यांना आधी आव्हान होते ते मार्क्सवाद्यांचे. नंतर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई-विरारचा पट्टा ओलांडून येथे पाय रोवले. पण मोदी लाटेत तब्बल ५३ टक्के म्हणजे पाच लाख ३३ हजार २०१ मते मिळवत चिंतामण वनगा यांनी तो मिळवला. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरून भाजपात सुरू असलेल्या घोळाचा फायदा उठवत शिवसेनेने त्यांना प्रवेश देत मतदारसंघावर दावा सांगितला. त्यामुळे काँग्रेसमधून राजेंद्र गावितांना फोडून त्यांना संधी देत भाजपाने प्रचंड ताकद लावत हा मतदारसंघ राखला. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने गेली दोन दशके येथे काम करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्याचीच परिणती सामूहिक राजीनाम्यात होते आहे. चिंतामण वनगा यांना जरी पाच लाखांवर मते मिळाली असली, तरी पोटनिवडणुकीत वेगळे लढताना भाजपाने २ लाख ७२ हजार, तर शिवसेनेने २ लाख ३३ हजार मते मिळवली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मतांची ताकद स्पष्ट झाली. बहुजन विकास आघाडीला गेल्या तिन्ही निवडणुकांत येथे साधारण सव्वादोन लाखाच्या घरात मते मिळाली आहेत. शिवसेनेतर्फे याहीवेळी श्रीनिवास वनगा यांनाच संधी दिली जाईल. पण त्यांना भाजपा-संघ परिवाराची सरसकट मते मिळतील की नाही, हे सध्या सांगणे कठीण आहे.

काँग्रेस आघाडीने ही जागा बविआला सोडली तर शिवसेना विरूद्ध बविआ अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यातही मार्क्सवाद्यांचा पाठिंबा मिळवण्याची खेळी यशस्वी झाली; तर बविआ, काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांची मिळून मतांत साधारण लाखाची भर पडेल, असे राजकीय आडाखे बांधले जात आहेत. या मतदारसंघात स्वतंत्रपणे राजकारण करतानाही बविआने कधी सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेतलेली नाही. पण त्यासाठी हाती मतदारसंघ असणे आवश्यक असल्याने बविआला येथे निकराने लढावे लागेल. दोन्ही पक्षांच्या या गरजा लक्षात घेतल्या तर येथील निवडणूक रंगतदार होईल. या दोन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांची फळी, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभाव असल्याने बहुजन आघाडी कोणता उमेदवार देते यावर लढतीचे चित्र अवलंबून राहील.सध्याची परिस्थितीआदिवासी आणि मराठा आरक्षणामुळे नाराज कुणबी समाजाची मते कोणाच्या पारड्यात पडतात, त्याकडे लक्ष. बुलेट ट्रेनसह विविध प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन, त्याचा फटका बसलेल्यांची नाराजी हाही निवडणुकीत कळीचा मुद्दा. हितेंद्र ठाकुरांना विरोध करणारे, पूर्वी शिवसेनेचे नेते असलेले आणि श्रमजिवींच्या नावे आदिवासींची ताकद हाती असलेले विवेक पंडित यांनी पोटनिवडणुकीत भाजपाला मदत केली होती. आता त्यांच्यावर सेनेची भिस्त आहे. एमएमआरडीएपरिसराची हद्द वाढवून त्यात वसई आणि पालघरचा समावेश करीत बिल्डर, उद्योजकांतील नाराजी कमी करण्याचा भाजपाकडून प्रयत्न.

 

टॅग्स :palgharपालघर