शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

संगीत नाटक टिकवणं सर्वांचेच आद्य कर्तव्य : मधुवंती दांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 07:05 IST

अभिजात मराठी संगीत नाटक हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा..

ठळक मुद्देयंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर

मराठी संगीत रंगभूमीवरील एक ॠषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मधुवंती दांडेकर. रंगभूमीवरील 55 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ मराठीच नव्हे तर उर्दू आणि गुजराती रंगभूमीवर देखील स्वत:चा वेगळा ठसा उमटविणा ऱ्या प्रतिभावंत गायिका आणि अभिनेत्रीला राज्य शासनातर्फे यंदाचा ‘अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त ’लोकमत’ शी साधलेल्या संवादातून  ‘अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा मिळालेला पुरस्कार हा आशिर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात संगीत नाटकांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवून ठेवत त्याचे सादरीकरण केल्यास संगीत नाटकांना मरण नसल्याचेही त्या म्हणाल्या. 

------------------------------------------- 

नम्रता फडणीस

 * मराठी रंगभूमीचे आद्य संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दलची भावना काय? - मी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या  ‘संगीत सौभद्र’ नाटकात सुभद्रेची भूमिका केली. गुरू स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासमवेत याच नाटकात रूख्मिणीची भूमिका देखील करायला मिळाली. भूमिका फार मोठी नसली तरी ती नेमकेपणाने मांडली जाणं हे महत्वाचं असतं. कथा खूप छोटी असतानाही लिखाणातून कथानक उभं करण्याची ताकद त्यांच्यात होती. अण्णांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा एक आशीर्वाद असल्याचे मी मानते. चांगलं काम करण्याची उर्जा यातून मिळते. 

*  रंगभूमीवरील इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव कसा होता?

 - स्वरराज छोटा गंधर्व, पं. राम मराठे यांच्यासारख्या गुरूस्थानी असलेल्या कलावंतांबरोबर काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. हे सर्व कलाकार उत्तम गवय्ये होते. शास्त्रीय संगीताची त्यांची बैठक उत्तम होती. त्यांच्याकडून नाट्यपदं कशी गायची ते शिकायला मिळाले. अभिनयातही त्यांचा हातखंडा होता. गुरूस्थानी असलेल्या जयमाला शिलेदार यांच्याबरोबर जरी काम केले नसले तरी त्यांच्या भूमिकांच्या निरीक्षणातून खूप काही शिकले. संगीत नाटकांचा जो वारसा यांच्याकडून चालत आला आहे. तोच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विद्याधर गोखले यांच्या  रंगशारदा संस्थेच्या नाटकांमध्ये जे शिकले ते सादर करता आले याचा आनंद आहे.

 * मराठी संगीत नाटकांबरोबरच उर्दू आणि गुजराती नाटकांकडे कशा वळलात? 

-शासनाच्या उर्दू विभागातर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असतं. त्यांच्यामार्फत विद्याधर गोखले यांच्या पुढाकारातून  ‘नेक परवीन’नाटक करायचं ठरलं. त्यात मी नायिकेची भूमिका केली. ग्वाल्हेर च्या विजय चौहान यांच्याकडे मी गझलचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे उर्दू भाषा अवगत होतीच. त्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. मराठी ' सुवर्णतुला' नाटक गुजरातीमध्ये करण्यासाठी निर्मात्याला अभिनेत्री मिळत नव्हती. त्यासाठी मला विचारणा झाल्यानंतर मी त्या भाषेचा अभ्यास केला. गुजरातीचा गंध नसतानाही रूख्मिणीची भूमिका चांगल्या प्रकारे वठवता आली याचा आनंद आहे. सध्याच्या काळात संगीत नाटकांच्या बाबतीत असे प्रयोग होताना दिसत नाहीत. 

* मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची उज्वल परंपरा लाभली आहे. मध्यंतरीच्या काळात संगीत नाटकांना उतरती कळा लागली. त्याबाबत तुमची निरीक्षणे कोणती?

 - पूर्वी गंधर्व काळात संगीताचा प्रसार होता. रसिकांना सकस कलाप्रकार अनुभवायला मिळत होता. त्यानंतरच्या काळात बोलपट आणि चित्रपट आले. सध्याचा विचार केला तर प्रेक्षकांसमोर अनेक माध्यमं समोर आहेत. कला अनुभवायला एक स्वस्थता लागते. जी तरूण पिढीकडे नाही. त्यांच्याकडे कलागुण आहेत. पण त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही ही वस्तु स्थिती आहे. संगीत नाटकासाठी लेखन, संगीत चांगलं हवं. गायनाची उत्तम तयारी हवी. अशी तरूण मंडळी पुढे आली तर नाटकं नक्की होतील. प्रत्येक नाटक कंपनींनी संगीत नाटक करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानलं तर आजची तरूण पिढी संगीत नाटकं करू शकतील आणि ती पुन्हा रंगमंचावर येतील. अभिजात मराठी संगीत नाटक हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. तो टिकवून ठेवला पाहिजे. चांगल्या संगीत नाटकांना प्रेक्षक येतोच. संगीत नाटकांबददल व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता त्याचे नव्या पद्धतीने उत्तम दर्जा आणि गुणवत्ता टिकवून सादरीकरण व्हायला हवे.

 * रिअँलिटी शोमधील लहान मुलांच्या सादरीकरणाबददल काय वाटतं? 

-रिअँलिटी शोमध्ये लहान मुलं खूप उत्तम गातात. त्यांची आकलन क्षमता उत्तम असते. पण ते ऐकून सादरीकरण केलेले असते. संगीतात स्वत: ची साधना आणि तालीम देखील महत्वाची आहे. मुलाला प्रसिद्धधी मिळेल त्याचं नाव होईल अशी अपेक्षा पालकांनी ठेवू नये. संगीत विद्या म्हणून शिकले गेले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकState Governmentराज्य सरकार