महिंद्र अँड महिंद्र महाराष्ट्रात करणार आठ हजार कोटींची गुंतवणूक

By Admin | Updated: February 15, 2016 17:34 IST2016-02-15T17:30:45+5:302016-02-15T17:34:09+5:30

महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या सात वर्षांमध्ये करणार आहे.

Mahindra & Mahindra invested 8,000 crores in Maharashtra | महिंद्र अँड महिंद्र महाराष्ट्रात करणार आठ हजार कोटींची गुंतवणूक

महिंद्र अँड महिंद्र महाराष्ट्रात करणार आठ हजार कोटींची गुंतवणूक

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या सात वर्षांमध्ये करणार आहे. सोमवारी कंपनीने जाहीर केले की विस्तार योजनेचा भाग म्हणून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये पायाभूत सुविधा देणे, उत्पादनांचा विकास करणे आणि वाहन निर्मितीची क्षमता वाढवणे यामध्ये करण्यात येणार आहे.
या संदर्भात राज्य सरकारशी सामंजस्य करारही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या आहेत. 
महिंद्रचे महाराष्ट्रात चाकण, नाशिक, कांदिवली आणि इगतपुरी या चार ठिकाणी कारखाने आहेत. याखेरीज तेलंगणा आणि उत्तराखंड येथेही कंपनीचा प्रत्येकी एक कारखाना आहे. 
 

Web Title: Mahindra & Mahindra invested 8,000 crores in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.