महिंद्र अँड महिंद्र महाराष्ट्रात करणार आठ हजार कोटींची गुंतवणूक
By Admin | Updated: February 15, 2016 17:34 IST2016-02-15T17:30:45+5:302016-02-15T17:34:09+5:30
महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या सात वर्षांमध्ये करणार आहे.

महिंद्र अँड महिंद्र महाराष्ट्रात करणार आठ हजार कोटींची गुंतवणूक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये महिंद्र आणि महिंद्र ही कंपनी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या सात वर्षांमध्ये करणार आहे. सोमवारी कंपनीने जाहीर केले की विस्तार योजनेचा भाग म्हणून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्रातल्या कारखान्यांमध्ये पायाभूत सुविधा देणे, उत्पादनांचा विकास करणे आणि वाहन निर्मितीची क्षमता वाढवणे यामध्ये करण्यात येणार आहे.
या संदर्भात राज्य सरकारशी सामंजस्य करारही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या आहेत.
महिंद्रचे महाराष्ट्रात चाकण, नाशिक, कांदिवली आणि इगतपुरी या चार ठिकाणी कारखाने आहेत. याखेरीज तेलंगणा आणि उत्तराखंड येथेही कंपनीचा प्रत्येकी एक कारखाना आहे.
Mahindra & Mahindra: Total investment ₹ 8000 crore (Nashik 6500 cr+ Chakan 1500 Cr).#Maharashtra MoUs at @makeinindia !@anandmahindra
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 15, 2016