शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवलीय, हिशोब चुकता करावा लागेल, विजय वडेट्टीवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:46 IST

Vijay Wadettiwar : आता महाराष्ट्राच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. पुढची लढाई 'करो किंवा मरो'ची आहे. महाराष्ट्र वाचविण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, असंही विजय वडेट्टीवार सांगितलं.

Vijay Wadettiwar : मुंबई : महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवली आहे. त्यामुळं महायुतीचा हिशोब चुकता करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. महात्मा गांधी यांच्या ऑगस्ट क्रांतीला ८२ वर्षे होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनं मुंबईत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळं आपल्याला सावध राहिले पाहिजं. इंग्रजांविरोधात बंड पुकारताना महात्मा गांधींनी 'चले जाव'चा नारा दिला होता. आता महायुती सरकारविरोधात 'चले जाव'चा नारा द्यावा लागणार आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण केलं जात आहे. त्यामुळं आपल्याला सावध राहिले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून महायुती सरकारला मतं मिळत नाही म्हणून हे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळं पुढचे दोन अडीच महिने दक्ष राहून या प्रवृत्तीविरोधात लढावं लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

महात्मा गांधी यांनी 'करो या मरो' असा नारा दिला. इंग्रजांचे सोबती आता सत्तेत आहेत आणि तेच आता देशभक्ती सांगत आहेत. महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवली आहे. त्यामुळं महायुतीचा हिशोब चुकता करावा लागेल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.

याचबरोबर, राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. राहुल गांधी या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत. ही लढाई आपल्याला पुढे न्यावी लागणार आहे. आता महाराष्ट्राच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. पुढची लढाई 'करो किंवा मरो'ची आहे. महाराष्ट्र वाचविण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, असंही विजय वडेट्टीवार सांगितलं. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण