लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतःला आशियातील दुसरी सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणवून घेणारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) आता देशात सर्वांत तळाला पोहोचली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात, देशातील ५२ वीज कंपन्यांच्या यादीत महावितरण थेट शेवटच्या (५२ व्या) क्रमांकावर फेकली गेली आहे. गेल्या वर्षी १५.५ गुण मिळवणाऱ्या महावितरणला यावर्षी १०० पैकी अवघे १.५ गुण मिळाले असून, कंपनीला 'सी' ग्रेड देण्यात आला आहे. आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या कंपनीची 'ऐतिहासिक' घसरण झाली आहे.
महागडी वीज, पण सेवा गायब
देशात सर्वात निकृष्ट कामगिरी असूनही महावितरणचे दर मात्र गगनाला भिडलेले आहेत.घरगुती ग्राहक : ८ ते १३ रुपये प्रति युनिटऔद्योगिक ग्राहक १०८८ रुपये प्रति युनिटव्यावसायिक ग्राहक : तब्बल १८ रुपये प्रति युनिट
इतके पैसे मोजूनही ग्राहकांना वारंवार
खंडित होणारा वीजपुरवठा आणि निकृष्ट सेवेचा सामना करावा लागत आहे.
सरकारची उदासीनता कारणीभूत ?
गुजरातसारख्या राज्यांनी वीजचोरीवर कडक कारवाई आणि स्मार्ट मीटरिंगद्वारे आपल्या कंपन्या फायद्यात आणल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात ऑडिटचे इशारे आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत व्यावसायिक व्यवस्थापन आणि १०० टक्के प्रीपेड स्मार्ट मीटरिंगसारखे उपाय राबवले जात नाहीत, तोपर्यंत सामान्य जनतेची ही 'वीज लूट' थांबणार नाही.
का ठरली 'महावितरण' फेल ?
- प्रचंड गळती आणि वीजचोरी: महावितरणच्या पुरवठ्यात २४.२ टक्के वीजगळती होते. तर राष्ट्रीय सरासरी केवळ १६.३ टक्के आहे. वीजचोरी, अनधिकृत कृषी पंप आणि कमकुवत अंमलबजावणीमुळे होणाऱ्या या नुकसानीचा भार प्रामाणिक ग्राहकांना जादा बिलाच्या स्वरूपात सोसावा लागत आहे.
- वसुलीत कमालीचा आळस : देशातील सर्वोत्तम वीज कंपन्या १५ दिवसांत बिलाची वसुली करतात. मात्र, महावितरणला बिल वसुलीसाठी सरासरी २०० दिवस लागतात.
- आर्थिक गैरव्यवस्थापन : कंपनीवर सध्या २०,००० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. ऑडिटर्सनी कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
- नियोजनाचा अभाव : स्मार्ट मीटर बसवण्यास झालेला विलंब, ग्रामीण भागातील खिळखिळी पायाभूत सुविधा आणि उत्तरदायित्वाचा अभाव यामुळे महावितरणचे कंबरडे मोडले आहे.
- राज्यातच तुलना, खासगी कंपन्या उजव्या : एकाच नियामक मंडळाच्या (एमईसीएल) अंतर्गत काम करूनही खासगी कंपन्या आणि महावितरण यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
मुंबईतील खासगी कंपन्या जर अव्वल ठरू शकतात, तर महावितरणला ग्रामीण भागाचे कारण पुढे करून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. हे पूर्णपणे प्रशासकीय अपयश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Web Summary : Mahavitaran, once Asia's second-largest electricity distributor, ranks last nationally due to high costs, poor service, and electricity theft. Despite expensive rates for consumers, power outages are frequent. Inefficient management, delayed smart meters, and substantial financial mismanagement contribute to this decline, contrasting sharply with successful private companies.
Web Summary : कभी एशिया की दूसरी सबसे बड़ी बिजली वितरक रही महावितरण, उच्च लागत, खराब सेवा और बिजली चोरी के कारण राष्ट्रीय स्तर पर अंतिम स्थान पर है। उपभोक्ताओं के लिए महंगी दरों के बावजूद, बिजली कटौती बार-बार होती है। अक्षम प्रबंधन, स्मार्ट मीटर में देरी और पर्याप्त वित्तीय कुप्रबंधन इस गिरावट में योगदान करते हैं, जो सफल निजी कंपनियों के विपरीत है।