शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:17 IST

आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला प्रस्ताव दिला असं छगन भुजबळांनी सांगितले.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) म्हणाले की, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमच्यात चर्चा सकारात्मक झाली. आम्ही एक प्रस्ताव दिला त्यावर त्यांनीही प्रस्ताव दिला. आमच्यात हसत खेळत चर्चा झाली. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. आम्ही ३ वाजेपर्यंत वाट पाहू. आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. सहाव्या जागेसाठी जादाची मते मविआकडे जास्त आहेत. सहावा उमेदवार हा शिवसेनेचा नाही तर महाविकास आघाडीचा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचे होते ते आम्ही केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारासाठी मतांची गोळा बेरीज काय आहे याचं विश्लेषण बैठकीत केले. भुजबळांच्या नेतृत्वात आम्ही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांच्याशी चर्चा केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४ उमेदवार उभे आहेत. तर भाजपाचे ३ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे भाजपानं या निवडणुकीत माघार घ्यावी त्याची परतफेड विधान परिषदेच्या निवडणुकीत करू असं बैठकीत सांगितले आहे अशी माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली.  

मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस