शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:17 IST

आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला प्रस्ताव दिला असं छगन भुजबळांनी सांगितले.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) म्हणाले की, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमच्यात चर्चा सकारात्मक झाली. आम्ही एक प्रस्ताव दिला त्यावर त्यांनीही प्रस्ताव दिला. आमच्यात हसत खेळत चर्चा झाली. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. आम्ही ३ वाजेपर्यंत वाट पाहू. आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. सहाव्या जागेसाठी जादाची मते मविआकडे जास्त आहेत. सहावा उमेदवार हा शिवसेनेचा नाही तर महाविकास आघाडीचा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचे होते ते आम्ही केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारासाठी मतांची गोळा बेरीज काय आहे याचं विश्लेषण बैठकीत केले. भुजबळांच्या नेतृत्वात आम्ही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांच्याशी चर्चा केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४ उमेदवार उभे आहेत. तर भाजपाचे ३ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे भाजपानं या निवडणुकीत माघार घ्यावी त्याची परतफेड विधान परिषदेच्या निवडणुकीत करू असं बैठकीत सांगितले आहे अशी माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली.  

मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस