शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:17 IST

आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला प्रस्ताव दिला असं छगन भुजबळांनी सांगितले.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) म्हणाले की, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमच्यात चर्चा सकारात्मक झाली. आम्ही एक प्रस्ताव दिला त्यावर त्यांनीही प्रस्ताव दिला. आमच्यात हसत खेळत चर्चा झाली. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. आम्ही ३ वाजेपर्यंत वाट पाहू. आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. सहाव्या जागेसाठी जादाची मते मविआकडे जास्त आहेत. सहावा उमेदवार हा शिवसेनेचा नाही तर महाविकास आघाडीचा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचे होते ते आम्ही केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारासाठी मतांची गोळा बेरीज काय आहे याचं विश्लेषण बैठकीत केले. भुजबळांच्या नेतृत्वात आम्ही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांच्याशी चर्चा केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४ उमेदवार उभे आहेत. तर भाजपाचे ३ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे भाजपानं या निवडणुकीत माघार घ्यावी त्याची परतफेड विधान परिषदेच्या निवडणुकीत करू असं बैठकीत सांगितले आहे अशी माहिती शिवसेना नेते अनिल देसाई यांनी दिली.  

मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस