शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 07:46 IST

आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची मविआची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर न झाल्याने महाविकास आघाडी संतप्त झाली आहे. आघाडीच्या नेत्यांकडून थेट निवडणूक आयोगालाच लक्ष्य करण्यात आले आहे. आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची टीका मविआच्या नेत्यांनी केली आहे.

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर करण्याचे आव्हान दिले तर नेते आदित्य ठाकरे यांनीही आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, एक राष्ट्र एक निवडणूक हा मुद्दा केवळ चर्चेसाठी आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे कारण म्हणून ‘सुरक्षा दलांवर मर्यादा’ असे नमूद करते. महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे त्यांनी दिलेले आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील पाऊस.

आयोगाच्या म्हणण्यानुसार फक्त महाराष्ट्रातच मान्सून आहे, देशातील इतर राज्यांमध्ये नाही?, असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका करताना राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असल्याने सरकार निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केला.  महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि विधानसभा निवडणुकीत ते महायुतीला नाकारतील, असा दावा त्यांनी केला. 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये  निवडणुका घेण्याचे धाडस त्यांच्यात नसल्याने दिवाळीनंतरच निवडणुका होतील, असा टोला लगावला.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी