शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 07:46 IST

आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची मविआची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर न झाल्याने महाविकास आघाडी संतप्त झाली आहे. आघाडीच्या नेत्यांकडून थेट निवडणूक आयोगालाच लक्ष्य करण्यात आले आहे. आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची टीका मविआच्या नेत्यांनी केली आहे.

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर करण्याचे आव्हान दिले तर नेते आदित्य ठाकरे यांनीही आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, एक राष्ट्र एक निवडणूक हा मुद्दा केवळ चर्चेसाठी आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे कारण म्हणून ‘सुरक्षा दलांवर मर्यादा’ असे नमूद करते. महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे त्यांनी दिलेले आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील पाऊस.

आयोगाच्या म्हणण्यानुसार फक्त महाराष्ट्रातच मान्सून आहे, देशातील इतर राज्यांमध्ये नाही?, असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका करताना राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असल्याने सरकार निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केला.  महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि विधानसभा निवडणुकीत ते महायुतीला नाकारतील, असा दावा त्यांनी केला. 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये  निवडणुका घेण्याचे धाडस त्यांच्यात नसल्याने दिवाळीनंतरच निवडणुका होतील, असा टोला लगावला.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी