शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

महाविकास आघाडीच ओबीसी हिताची मारेकरी; फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:57 IST

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला. 

ठाणे  : सध्याचे सरकार हे ओबीसी विरोधी आहे. ओबीसींच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जात नाही. ओबीसी राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीच असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.भाजपच्या ओबीसी सेलच्यावतीने येथे आयोजित ओबीसी जागर अभियानामध्ये ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला. १५ डिसेंबर २०१९ रोजी नवीन सरकारच्या काळात आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागास आयोग स्थापन करा, असे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयात आठ वेळा सुनावणी होऊनही त्याची माहिती सध्याच्या सरकारने दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने ५ मार्च २०२१ रोजी राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी हे सरकार आंदोलन करत बसले, आता तब्बल १५ महिन्यांनंतर या सरकारने अध्यादेश काढला आहे. ओबीसींचा चुकीचा तपशील केंद्राकडे सादर करण्यात आला होता. केंद्राने त्यानुसार चुकीची माहिती आल्याचे सांगत वेळ वाढवून मागितली होती. किमान माहिती तरी योग्य पद्धतीने दिली असती तर ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.’मुख्यमंत्र्यांचे काम शरद पवारच करतात’  जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यांच्यात मी मुख्यमंत्री असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच काम नाही. त्यांचे काम शरद पवारच करतात, असा टोला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षण