शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

महाविकास आघाडीच ओबीसी हिताची मारेकरी; फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:57 IST

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला. 

ठाणे  : सध्याचे सरकार हे ओबीसी विरोधी आहे. ओबीसींच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जात नाही. ओबीसी राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीच असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.भाजपच्या ओबीसी सेलच्यावतीने येथे आयोजित ओबीसी जागर अभियानामध्ये ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला. १५ डिसेंबर २०१९ रोजी नवीन सरकारच्या काळात आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागास आयोग स्थापन करा, असे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयात आठ वेळा सुनावणी होऊनही त्याची माहिती सध्याच्या सरकारने दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने ५ मार्च २०२१ रोजी राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी हे सरकार आंदोलन करत बसले, आता तब्बल १५ महिन्यांनंतर या सरकारने अध्यादेश काढला आहे. ओबीसींचा चुकीचा तपशील केंद्राकडे सादर करण्यात आला होता. केंद्राने त्यानुसार चुकीची माहिती आल्याचे सांगत वेळ वाढवून मागितली होती. किमान माहिती तरी योग्य पद्धतीने दिली असती तर ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.’मुख्यमंत्र्यांचे काम शरद पवारच करतात’  जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यांच्यात मी मुख्यमंत्री असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच काम नाही. त्यांचे काम शरद पवारच करतात, असा टोला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षण