शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 17:42 IST

ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? असं रणजीत सावरकर म्हणाले.

मुंबई - नथुराम गोडसेच्या पिस्तुलाने झाडलेल्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झाली नाही. या तपास नीट झाला नाही त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरु कुटुंबाला झाला असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. फॉरेन्सिक पुराव्याद्वारे आपण हे विधान करतोय. गांधी हत्येतील दडवलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणीही सावरकरांनी केली आहे. 

रणजीत सावरकर म्हणाले की, गांधींच्या जखमांची जी मापे आहेत. त्यात Entry Hole 4.2 MM आहे तर Exit Hole 6.5 MM आहे. गोडसेची पिस्तुल ही 9 MM ची होती. ही जखम मोठी असायला हवी होती. ज्यादिशेने ही गोळी आली त्यात एक गोळी बाहेरून आतमध्ये आलीय तर दुसरी गोळी आतून बाहेर आलेली आहे. वेगवेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. नथुराम गोडसेने २ फुटावरून गोळी झाडली असं म्हटलं गेले. परंतु ती जखम त्या गोळ्यांची नाही. त्या जखमेवरील दिशाही गोडसेच्या पिस्तुलीतून झाडलेल्या गोळीची नाही असा दावा त्यांनी केला. 

तसेच दोन किंवा जास्त मारेकऱ्यांनी छोट्या गोळ्यांनी ही हत्या केली. नथुराम गोडसेने ही हत्या केली नाही हे फॉरेन्सिक पुराव्यातून सिद्ध होते. गोडसे यांना हत्येच्या प्रयत्नाखाली शिक्षा झाली असती परंतु हत्येची शिक्षा नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? सरकारने चौकशी करावी. जनतेला जर वाटत असेल तर सरकारने चौकशी केली पाहिजे अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. रणजीत सावरकर हे सावरकरांचे पणतू आहेत. 

दरम्यान, २० ते ३० जानेवारी काळात असे ६० प्रसंग होते, ज्यावेळी नथुराम गोडसेला पोलिसांना पकडता आले असते. पण त्यांनी पकडले नाही. १० दिवस पोलिसांनी अजिबात काही केले नाही. ज्या लोकांनी खोटे पंचनामे केले त्यातील अनेकांना प्रमोशन देऊन निवृत्त करण्यात आले. गांधींच्या हत्येचा फायदा नेहरुंना झाला. दुसरा फायदा ब्रिटनला झाला. ब्रिटनची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. परंतु भारतात नेहरुंचे राज्य आल्यानंतर ब्रिटन मोस्ट फेवर्ड नेशन राहिला.  ब्रिटनचे कमी दर्जाचे तंत्रज्ञानही आपण महागात घेत राहिला. त्यामुळे ब्रिटनचे अर्थकारण पुढील २०-३० वर्ष सुरक्षित राहिले. १९७१ च्या विमानात आपल्याकडे हंटर विमाने होती. संरक्षण खात्यात भारताचे बरेच नुकसान झाले असंही रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे. 

गांधीवादी नेत्यांनी दावा फेटाळला

खोटे बोलणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित लोकांचे विशेष आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. नथुरामने गोळी झाडली. त्यावर कपूर आयोग झाला, खटला झाला, त्याने कबूल केले आणि हत्येआधी तिनदा गोडसेने गांधींना मारण्याचा प्रयत्न केला होता. महाबळेश्वरला गांधींच्या दिशेने चाकू घेऊन गोडसेच धावला होता. तेव्हा तिथल्या लोकांनी पकडले. मात्र त्याला मारू नका, माझ्याशी चर्चा करायला पाठवा असं गांधींनी म्हटलं. त्यामुळे हे खोटे सांगणे, निवडणुकीत आता हेच होणार आहे. भाजपाकडे सांगण्यासारखे काही उरले नाही म्हणून आता ते लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असेच काहीतरी बोलत राहणार असं सांगत गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी रणजीत सावरकरांचा दावा फेटाळून लावला. 

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेMahatma Gandhiमहात्मा गांधी