शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला आता ‘छोडो भाजपा’ चा नारा देण्याची गरज’’, शरद पवार यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 22:31 IST

Sharad Pawar News: स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी मुंबईतून ब्रिटिशांविरोधात भारत छोडो चा नारा दिला होता. आता भाजप छोडो नारा देण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन केलं.

आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर घणाघाती टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडो चा नारा दिला होता. आता भाजप छोडो नारा देण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.

यावेळी नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवरही शरद पवार यांनी टीका केली. शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थितीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. मोदींच्या गॅरंटीबाबत मागच्या दिवसांपासून सातत्यानं ऐकावं लागत होतं. मात्र हे आजपासून ऐकावं लागणार नाही. त्यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. आता मोदींची गॅरंटी चालणार नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी