शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharastra Political Crisis: महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निर्णय अध्यक्षांकडे आला तर? नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:57 IST

Maharastra Political Crisis:'येणारा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही, याचा सर्व देशावर परिणाम होईल.'

Maharastra Political Crisis: अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरील निकालाचा तो दिवस उजाडणार आहे. सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचुड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिले आहेत. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र ठरवलं किंवा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आला तर काय होणार, यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, त्यावेळी जो मी निर्णय दिला, मी दिलेला निर्णय कुठल्याही राजकीय आकसापोटी दिलेला नव्हता. सभागृह सार्वभौम आहे, ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तोच निर्णय दिला होता. मला विश्वास आहे की, न्यायदेवता सुद्धा माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल. सुप्रीम कोर्टाने निर्णयाचा अधिकार विधीमंडळाला घ्यायला सांगितला, तर तो मलाच द्यावा लागेल, कारण मीच त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष होतो. आता मी अध्यक्ष नसलो तरी तिथल्या प्रक्रियेत एका संविधानिक पदावर आहे, असं झिरवळ म्हणाले.

ते पुढे म्हणतात, माझ्यासमोर जर निकाल देण्याची स्थिती आली, तर माझ्यासमोर एवढ्या दिवस झालेला युक्तीवाद आहे. मी घटनेला अनुसरुनच निर्णय दिला होता, त्यामुळे त्यात बदल करण्याचे काही कारण नाही. न्यायालय निर्णय घेणार की नाही? यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, एकाद्या कायदेशीर प्रक्रियेबाबात सभागृहात तोडगा निघत नसेल तर त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्ट आहे. कारण हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, असंही झिरवळ म्हणाले.

येणारा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतला तरी कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल किंवा तो माझ्याकडे आला तरीदेखील 16 आमदार अपात्र ठरतील. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विश्वास आहे, तर मलाही विश्वास आहे की माझ्याकडेच याचा निर्णयाचा अधिकार येईल. सरकार स्थिर व्हायला पाहिजे, जनता विविध कारणांनी होरपळून निघाली आहे, असंही नरहरी झिरवळ म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNarhari Jhariwalनरहरी झिरवाळPoliticsराजकारणBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे