शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Maharastra Political Crisis: महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निर्णय अध्यक्षांकडे आला तर? नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:57 IST

Maharastra Political Crisis:'येणारा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही, याचा सर्व देशावर परिणाम होईल.'

Maharastra Political Crisis: अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरील निकालाचा तो दिवस उजाडणार आहे. सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचुड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिले आहेत. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र ठरवलं किंवा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आला तर काय होणार, यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, त्यावेळी जो मी निर्णय दिला, मी दिलेला निर्णय कुठल्याही राजकीय आकसापोटी दिलेला नव्हता. सभागृह सार्वभौम आहे, ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तोच निर्णय दिला होता. मला विश्वास आहे की, न्यायदेवता सुद्धा माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल. सुप्रीम कोर्टाने निर्णयाचा अधिकार विधीमंडळाला घ्यायला सांगितला, तर तो मलाच द्यावा लागेल, कारण मीच त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष होतो. आता मी अध्यक्ष नसलो तरी तिथल्या प्रक्रियेत एका संविधानिक पदावर आहे, असं झिरवळ म्हणाले.

ते पुढे म्हणतात, माझ्यासमोर जर निकाल देण्याची स्थिती आली, तर माझ्यासमोर एवढ्या दिवस झालेला युक्तीवाद आहे. मी घटनेला अनुसरुनच निर्णय दिला होता, त्यामुळे त्यात बदल करण्याचे काही कारण नाही. न्यायालय निर्णय घेणार की नाही? यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, एकाद्या कायदेशीर प्रक्रियेबाबात सभागृहात तोडगा निघत नसेल तर त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्ट आहे. कारण हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, असंही झिरवळ म्हणाले.

येणारा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतला तरी कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल किंवा तो माझ्याकडे आला तरीदेखील 16 आमदार अपात्र ठरतील. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विश्वास आहे, तर मलाही विश्वास आहे की माझ्याकडेच याचा निर्णयाचा अधिकार येईल. सरकार स्थिर व्हायला पाहिजे, जनता विविध कारणांनी होरपळून निघाली आहे, असंही नरहरी झिरवळ म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNarhari Jhariwalनरहरी झिरवाळPoliticsराजकारणBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे