शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

महाराष्ट्राचा स्वाभिमान अजून विकलेला नाही- विरेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:56 IST

निर्णय त्वरित मागे घेतला अन्यथा या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जातील असा सज्जड इशारा देखील विरेंद्र पवार यांनी दिला आहे. 

मुंबई: महाराष्ट्राचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले जवळपास २५ गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विरेंद्र पवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

विरेंद्र पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या गडकिल्ल्यांच्या विषयी संबंध भारतवर्षातील शिवप्रेमींनी श्रद्धा आहे, या पावन भूमीला वंदन करीत कित्येक पिढ्या ह्यातून स्फूर्ती घेतात. तसेच गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्याकरिता तमाम शिवप्रेमी किल्ल्यांवर कुठला ही अनुचित प्रकार घडून देत नाहीत, तसा दंडकच आहे. परंतु जरी कोणी समाजकंटकांनी दारू सिगारेट पिणे, युगुलानी प्रेमचाळे सारखे काही प्रकार केल्यास त्यांना तिथेच चांगलाच चोप दिला जातो. मात्र सरकार तर हॉटेल उघडून हिडीस संस्कृती व हनिमूनलाच समंती देत आहे. महसूल कमाईचा असला मार्ग सरकारने जरी शोधला असेल तरी महाराष्ट्राने अजून स्वाभिमान विकला नाही,अशी गर्जना करीत सरकारने जर हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर अन्यथा या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जातील असा सज्जड इशारा देखील विरेंद्र पवार यांनी दिला आहे. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जे गड किल्ले पावन झाले आहेत व संबंध भारतवर्षातील शिवप्रेमी त्या गाद किल्ल्यांच्या भूमीला वंदतात, त्याच गड किल्ल्यांचा वापर हॉटेल,लग्नसमारंभ,करमणूक कार्यक्रम साठी वापरण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे.सरकारच्या ह्या निर्णयामुळे सरकार त्यांच्या महसुलात वाढ करण्याकरिता आता ह्या थराला जाणार की काय असा सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस