शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
5
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
6
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
7
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
8
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
9
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
10
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
11
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
12
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
13
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
14
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
15
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
16
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
17
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
18
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
19
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
20
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

महाराष्ट्राचा स्वाभिमान अजून विकलेला नाही- विरेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:56 IST

निर्णय त्वरित मागे घेतला अन्यथा या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जातील असा सज्जड इशारा देखील विरेंद्र पवार यांनी दिला आहे. 

मुंबई: महाराष्ट्राचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले जवळपास २५ गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विरेंद्र पवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

विरेंद्र पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या गडकिल्ल्यांच्या विषयी संबंध भारतवर्षातील शिवप्रेमींनी श्रद्धा आहे, या पावन भूमीला वंदन करीत कित्येक पिढ्या ह्यातून स्फूर्ती घेतात. तसेच गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्याकरिता तमाम शिवप्रेमी किल्ल्यांवर कुठला ही अनुचित प्रकार घडून देत नाहीत, तसा दंडकच आहे. परंतु जरी कोणी समाजकंटकांनी दारू सिगारेट पिणे, युगुलानी प्रेमचाळे सारखे काही प्रकार केल्यास त्यांना तिथेच चांगलाच चोप दिला जातो. मात्र सरकार तर हॉटेल उघडून हिडीस संस्कृती व हनिमूनलाच समंती देत आहे. महसूल कमाईचा असला मार्ग सरकारने जरी शोधला असेल तरी महाराष्ट्राने अजून स्वाभिमान विकला नाही,अशी गर्जना करीत सरकारने जर हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर अन्यथा या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जातील असा सज्जड इशारा देखील विरेंद्र पवार यांनी दिला आहे. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जे गड किल्ले पावन झाले आहेत व संबंध भारतवर्षातील शिवप्रेमी त्या गाद किल्ल्यांच्या भूमीला वंदतात, त्याच गड किल्ल्यांचा वापर हॉटेल,लग्नसमारंभ,करमणूक कार्यक्रम साठी वापरण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे.सरकारच्या ह्या निर्णयामुळे सरकार त्यांच्या महसुलात वाढ करण्याकरिता आता ह्या थराला जाणार की काय असा सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस