शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

Maharashtra Winter Session: शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 12:35 IST

गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय असा आरोप भास्कर जाधवांनी केला.

नागपूर - सीमावादावर तोंड लपवायला जागा सरकारकडे शिल्लक नाही. कारण यांच्या २ मंत्र्यांनी राणा भीमदेवीच्या थाटात सांगितले आम्ही कर्नाटकात जाणार. मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला त्यानंतर चंद्रकांत पाटील गप्प झाले. दुसरा चंबु देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभु यांचा कर्नाटकबाबतीत चंबू झालाय. त्यामुळे हे सरकार अन्याय करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला या सरकारकडून काही मिळणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे, जोपर्यंत कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर न्याय देणारा आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेत येणार नाही तोपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही ही विरोधकांची भूमिका आहे आणि त्याबाबत आम्ही सभागृहात आवाज उचलणार आहोत. विदर्भ, मराठवाड्यावर लक्ष द्यायला सरकार तयार नाही. सीमाभागातील मराठी माणसांकडे पाहत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचार करणार, घोटाळे करणार आणि त्यांना क्लीनचीट देण्याचं कामही सरकार करणार. सत्ताधारी पक्षाचे नेते सत्तेची धमकी देत आहेत. त्याचा अर्थ हे सरकार न्यायबुद्धीने वागणारं नाही. सर्वांना समान न्यायानं वागणूक देणारं नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केला. 

शंभूराज देसाईंनी घेतला समाचारसभागृहात उद्धव ठाकरे दिसतायेत हे चांगले आहे. विधिमंडळात आल्यानंतर ते ठाकरे गटाच्या कार्यालयात न जाता काँग्रेस कार्यालयातून ते माघारी परतले. आज बऱ्याच दिवसांनी सभागृहात उपस्थित राहतील. राज्याच्या हिताबाबत, धोरणात्मक काही विषय दिशाभूल न करता सभागृहात मांडतील अशी अपेक्षा आहे. संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही. माझी ५०-५५ वेळा सांगितले त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. रोज नवीन मुद्दा काढतात आणि भरकटत दुसऱ्या मुद्द्याकडे जातात. नरेश म्हस्के यांच्या विभागात एक दवाखाना आहे त्याठिकाणी राऊतांवर उपचार केले पाहिजेत. माध्यमेच राऊतांकडे लक्ष देतात आम्ही लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShambhuraj Desaiशंभूराज देसाईBhaskar Jadhavभास्कर जाधव