शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session: शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 12:35 IST

गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय असा आरोप भास्कर जाधवांनी केला.

नागपूर - सीमावादावर तोंड लपवायला जागा सरकारकडे शिल्लक नाही. कारण यांच्या २ मंत्र्यांनी राणा भीमदेवीच्या थाटात सांगितले आम्ही कर्नाटकात जाणार. मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला त्यानंतर चंद्रकांत पाटील गप्प झाले. दुसरा चंबु देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभु यांचा कर्नाटकबाबतीत चंबू झालाय. त्यामुळे हे सरकार अन्याय करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला या सरकारकडून काही मिळणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे, जोपर्यंत कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर न्याय देणारा आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेत येणार नाही तोपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही ही विरोधकांची भूमिका आहे आणि त्याबाबत आम्ही सभागृहात आवाज उचलणार आहोत. विदर्भ, मराठवाड्यावर लक्ष द्यायला सरकार तयार नाही. सीमाभागातील मराठी माणसांकडे पाहत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचार करणार, घोटाळे करणार आणि त्यांना क्लीनचीट देण्याचं कामही सरकार करणार. सत्ताधारी पक्षाचे नेते सत्तेची धमकी देत आहेत. त्याचा अर्थ हे सरकार न्यायबुद्धीने वागणारं नाही. सर्वांना समान न्यायानं वागणूक देणारं नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केला. 

शंभूराज देसाईंनी घेतला समाचारसभागृहात उद्धव ठाकरे दिसतायेत हे चांगले आहे. विधिमंडळात आल्यानंतर ते ठाकरे गटाच्या कार्यालयात न जाता काँग्रेस कार्यालयातून ते माघारी परतले. आज बऱ्याच दिवसांनी सभागृहात उपस्थित राहतील. राज्याच्या हिताबाबत, धोरणात्मक काही विषय दिशाभूल न करता सभागृहात मांडतील अशी अपेक्षा आहे. संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही. माझी ५०-५५ वेळा सांगितले त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. रोज नवीन मुद्दा काढतात आणि भरकटत दुसऱ्या मुद्द्याकडे जातात. नरेश म्हस्के यांच्या विभागात एक दवाखाना आहे त्याठिकाणी राऊतांवर उपचार केले पाहिजेत. माध्यमेच राऊतांकडे लक्ष देतात आम्ही लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShambhuraj Desaiशंभूराज देसाईBhaskar Jadhavभास्कर जाधव