शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा खपवून घेणार नाही'; सीमाप्रश्नी देवेंद्र फडणवीस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:39 IST

मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली.

नागपूर:कर्नाटककडून सुरू असलेल्या कुरघोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सीमा भागातील जमीन महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी निर्धाराने लढा देण्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. दरम्यान, मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, मुंबई ही कर्नाटकाचीच आहे, अशी वक्तव्ये कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला कडक शब्दात सुनावले.

अजित पवारांची सरकारकडे मागणीकर्नाटकातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद विधानसभेत उमटले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे राज्य सरकारचे लक्ष या मुद्द्याकडे वळवून कर्नाटक सरकारला कडक शब्दात सुनावणारे पत्र पाठवण्याची मागणी केली. महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्याचा आपल्याला अभिमान आहे. कर्नाटकातील विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबई ही कर्नाटकचीच आहे, असे वक्तव्य करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कर्नाटककडून सीमाप्रश्नाला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सीमाप्रश्नी आक्रमकअजित पवारांच्या मुद्द्याची देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. जो विषय उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे. ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक झाली, तेव्हा दोन्ही राज्यांनी नवे दावे न करण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणानुसारच काल आपण ठराव केला आहे. कर्नाटकाच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी किंवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलेले दावे बैठकीशी विसंगत असून पूर्णपणे चुकीचे आहेत, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.

मुंबई कुणाच्या बापाची नाहीमुंबईवर दावा सांगण्याचा आम्ही निषेध आम्ही करतो. लवकच निषेधाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवू. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ. गृहमंत्र्यांसमोर ठरलेल्या गोष्टींचे उल्लंघन करणे दोन्ही राज्याच्या संबंधाबाबत योग्य नाही. मुंबई महाराष्ट्राचीच, ती कुणाच्या बापाची नाही. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही. अमित शहांनी ठरललेल्या गोष्टीचे पालन महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामुळे शहांनी कर्नाटकाच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक