शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session: आमच्याकडे बरेच बॉम्ब, वातीही काढल्यात, आता पेटवण्याची गरज; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:04 IST

दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमाप्रश्न आणि महाराष्ट्राचा फायदा काय झाला? अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कुठे पंचनामे झाले? कुठे मदत मिळाली? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला.

नागपूर - आमच्याकडे बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत. आता पेटवण्याची गरज आहे. परंतु सीमाभागात लाखो मराठी भाषिकांवर अन्याय होतोय त्यावर ठराव मांडणं गरजेचे आहे. तुम्ही आमच्यात असताना लाठ्या काठ्या खाल्ल्या म्हणून तुम्ही आता गप्प बसा असं होत नाही. केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत या मुद्द्यावर उत्तर नाही. हे अनैतिक सरकार असल्याने त्यांच्याकडून नैतिकता अपेक्षित नाही अशा शब्दात आमदार उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी उघड्यावर सोडलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्री हिंदुत्व मानणारे आहेत. म्हणून वारंवार देवदर्शनाला जातात. त्यामुळे त्यांना नवस करणं आणि फेडणे यासाठी दिल्लीला जावं लागतं. आजचा दिवस गेला म्हणून नवस फेडतायेत आणि उद्याचा दिवस नीट जाऊ द्या यासाठी नवस करतात. त्यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे? दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमाप्रश्न आणि महाराष्ट्राचा फायदा काय झाला? अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कुठे पंचनामे झाले? कुठे मदत मिळाली? महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्न आम्ही मांडले आहेत. परंतु त्यावर किती चर्चा होतेय हे सगळ्यांना माहित्येय. अधिवेशनाचे ७ दिवस कुणी वाया घालवले? ज्याने वाया घालवले त्याला जाब विचारा असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत गेली अनेक वर्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे. न्यायालयात विषय असताना दोन्ही राज्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. जो संयम महाराष्ट्र दाखवतोय तो कर्नाटक सरकारकडून दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयात विषय असतानाही बेळगावचं नामांतरण, उपराजधानीचा दर्जा दिला. मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. १८ व्या शतकापासून त्या भागात मराठी भाषा वापरली जाते हे सगळे पुरावे फिल्ममध्ये आहेत. महाजन रिपोर्टवर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी चिरफाड करणारे पुस्तक लिहिले ते मी सभागृहात दिले आहे. जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत कर्नाटकव्याप्त प्रदेश केंद्रशासित झाला पाहिजे. भाषिक अत्याचार जो सुरू आहे तो थांबवला पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, कधीही महाराष्ट्रात कानडी भाषिकांवर अत्याचार झाला नाही. परंतु सीमाभागात कानडी भाषेचा अत्याचार मराठी भाषिकांवर झाला आहे. तिथे सगळे व्यवहार कानडी भाषेत होतात. केवळ निषेध करण्याला कर्नाटक जुमानत नाही. एक इंचही जागा आम्हाला कर्नाटकची नको जी आमच्या हक्काची जागा आहे ती आम्ही मागतोय. कर्नाटक सरकार एक एक पाऊल पुढे जातंय त्यामुळे ठरावाला किंमत राहणार नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित व्हायला हवा ही आमची आग्रही मागणी आहे असंही ते म्हणाले.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे