शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

जातीय गट-तट विसरल्यास महाराष्ट्र ‘पाणीदार’ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 5:19 AM

एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अठरा पगड जातीच्या लोकांचा समावेश होता. महाराष्ट्रात इतक्या वर्षांपासून जलसंधारणाचे प्रयत्न होत नाही, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास हा दोष समाजातील गटा तटात असणाऱ्या हेवेदाव्यात आहे. एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अमृता देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.आमीर खानच्या पाणी फाउंडेशनचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या आतापर्यंतच्या सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, एकमेकांमधील गट तट जोपर्यंत दूर होणार नाहीत तोपर्यंत जलसंधारणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. पाणीप्रश्नावर जलसंधारण हे उत्तर आहे. मात्र तो प्रश्न केवळ सरकारच्या विश्वासावर सुटणार नाही. यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. जनतेकडून वेगवेगळ्या योजना तयार झाल्यास त्यांना हातभार लावण्याचे काम सरकार करेल. पाणी फाउंडेशन यशस्वी होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यात गावातील नागरिकांचा स्वयंस्फुर्त सहभाग. सामान्यांकडून असामान्य प्रकारचे काम करुन घेण्याचे श्रेय आमीर यांना द्यायला हवे. यापुढील वॉटरकपच्या स्पर्धांमध्ये देखील सर्वपक्षीय सहभाग असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विजेत्या तीनही गावांना शासनाच्यावतीने प्रोत्साहनपर अनुक्रमे २५ लाख, १५ लाख व १० लाखांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यमंत्री विजय शिवतारे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, किरण राव, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार यांची भाषणे झाली.निवडणूकीचा काळ असला तरी स्पर्धा होऊ द्यापुढील वर्षी होणाºया सार्वत्रिक निवडणुकीचा कुठलाही परिणाम वॉटर कप स्पर्धेवर होणार नाही. पाणी हा मुख्य प्रश्न आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिले आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेले़ पिकांचा पॅटर्न निश्चित करणे आवश्यक आहे. पाण्यासाठी एकच पक्ष असून त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खान यांना केली.स्वप्न पूर्ण करण्यास मदतीचा हातसुरुवातीला शंका होती. मात्र पुढे या स्पर्धेने जलसंधारणात झालेला बदल बघून समाधान वाटले. याकरिता गरजेनुसार जेसीबी देऊन वेळेत ते काम पूर्ण करण्याकरिता मोठ्या मेहनतीने गावकºयांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करता आली. याचा आनंद वाटतो, अशी भावना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केली.पाण्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय जुगलबंदीपुणे : कार्यक्रमाला सर्वच मान्यवर आहेत तेव्हा त्यांची नावे का घ्यायची, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वाक्याने ‘पानी फाउंडेशन’च्या त्या कार्यक्रमाचे व्यासपीठ राजकीय होणार याची कल्पना उपस्थितांना आली.आता कुठे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होत असेल तर यापूर्वीचे व सध्याचे असे दोन्ही सत्ताधारी पक्षाचे नेते उपस्थित असून त्यांनी इतक्या वर्षातला इरिगेशनचा पैसा कुठे गेला? याचे उत्तर द्यावे. राज यांच्या या प्रश्नावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर ‘काही लोकं नुसते बोलघेवडे असतात. त्यांना काही करायचे नसते. केवळ सभा जिंकायची असते.’ या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांना चिमटा काढला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची फिरकी घेतली.राज म्हणाले, गावातल्या लोकांना जागृत करण्याचे काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करते? जलसंधारणामध्ये जेवढे पाणी मुरले तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. ‘पानी फाउंडेशन’मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेसे पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल.तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांनी केला असता, श्रमदानासाठी नक्की येईल. सरकारमध्ये नसल्याने मला फावडे कसं चालवायचे हे माहिती नाही, तेवढे नक्की शिकवा, असे ते म्हणाले.आमीर यांना स्वत:वर कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का मारुन घेऊ नका, असा सल्ला पवार यांनी दिला. राज्यातील काही धरणे आज १०० टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्णात अजूनही पाण्याची गरज आहे. किरण ‘राव’ करेल तेच ‘गाव’ करेल, अशी कोटीही त्यांनी केली.राजकारणाशिवाय समाजसेवा करता येतेराजकीय दिग्गजांच्या उपस्थितीबाबत आमिरखान म्हणाला, मला राजकारणात रस नाही. कुठलेही सामाजिक काम करताना सर्जनशील कल्पना, त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी, आणि सर्वांचा सहभाग गरजेचा असतो. राष्ट्रउभारणीत रस असून राजकारणाशिवाय समाजसेवा करता येते. आपण सतत सरकारकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. दुसºयांकडे बोट करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्राकडे लक्ष दिल्यास बरेच प्रश्न कमी होतील.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस