शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 15:54 IST

थेट सत्तधारी पक्षातील नेत्यानेच असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई : मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला असतानाच महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसमध्येही सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दिसत नाही. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील आघाडी सरकारही अधिक काळ टिकणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. याचबरोबर 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना निरुपम यांनी स्वता:च्याच पक्षावर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या हालचालींवर दिल्लीतल्या जेष्ठ काँग्रेस नेत्यांचे लक्ष होते. या नेत्यांनी वेळीच त्यांना का आवर घातला नाही? असा सवाल निरुपम यांनी केला.

तसेच त्यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडीवरून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्रात कोणत्याही आधाराशिवाय तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांचे सरकार आहे. अनेक बाबींवर या सरकारचे एकमत होत नाही. त्यामुळे हे सरकार ठिकणे अवघड असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीचं तीन चाकाच सरकार असून, हे सरकार कधीही कोसळू शकते. तसेच तीनही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत नसून त्यांच्या विचारधारा वेगवगेळ्या असल्याने हे सरकार कधीही पडू शकते, असा दावा नेहमीच भाजपकडून केला जात आहे. मात्र आता थेट सत्तधारी पक्षातील नेत्यानेच असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.