शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 16:02 IST

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपानंतर राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तर प्रत्येकवेळी, माझी शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन करून मागील दोन निवडणुका जिंकणारे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच दमछाक होणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीनंतर परिवर्तन अटळ असल्याचे सूर उमटतांना दिसत आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादमधुन उमेदवारी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात असताना, ऐनवेळी त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना १५ हजार मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे पुन्हा असेच चित्र असेले तर राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित समजला जात आहे.

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही. साखर कारखाने,सूत मील बंद पडल्याने चव्हाण यांच्यावर नेहमीचा टीका होताना पाहायला मिळाले. तर आमदार चव्हाण मंत्री असताना त्यांच्या काळात मोठे उद्योग,व्यवसाय आले नाहीत. त्यातच आता मतदारसंघात शिवसेना व भाजपची ताकत वाढल्याने आमदार चव्हाण यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे यावेळी  तुळजापूरकर कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.