शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

"...तर विधानसभा निवडणुकीत महायुती २०० पार होईल"; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 20:35 IST

पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करण्याचे कार्यकर्त्यांना केलं आवाहन

Chandrashekhar Bawankule, BJP Maharashtra: "महाविकास आघाडी सरकार राज्यात आले, तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील. राज्यात महायुतीचे‌ सरकार आले‌ तर विकासाचे इंजिन धावणार आहे हे साऱ्यांनी जनतेला सांगावे. जिद्दीने संघर्ष करण्याचा आपला पिंड आहे. त्यामुळे आपण बूथ यंत्रणा मजबूत करून प्रत्येकाने नवे दहा मतदार मिळवण्यासाठी काम करायचे आहे. तसे झाले तर विधानसभा निवडणुकीत महायुती दोनशे पार होईल," असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बावनकुळे बोलत होते. यावेळी राज्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सह प्रभारी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

"देवेंद्र फडणवीस‌ यांनी मोठ्या परिश्रमाने मराठा आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा तयार केला, मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत. उद्धव ठाकरे सरकारने मोदी‌ सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचे पाप केले," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील नेतेमंडळी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षात नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चा आहे. अशा वेळी पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी दोन-तीन महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा आणि प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदवा, असे आवाहन बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahayutiमहायुती