शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता? बदलू शकतात अनेक ठिकाणची समीकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 09:04 IST

Maharashtra Election Updates: सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत. 

मुंबई : २०१९ च्या तुलनेत अनेक मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची कारणे व त्या वाढीव मतटक्क्यांचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.   वाढीव मतदान सत्तारुढ महायुतीला फटका देईल की, महाविकास आघाडीला याबद्दल वेगवेगळे तर्क दिले जात आहेत. 

सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत. 

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निश्चितपणे आम्हालाच फायदा झालेला आहे. निकालात तो प्रतिबिंबित होईल. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, सरकारविरोधात लाट असली तरच मतदान मोठ्या प्रमाणात वाढते, यावेळी तेच झाले असून निकालात दिसेल.

मतटक्का वाढण्याची अन्य कारणे कोणती? 

अपक्ष व बंडखोर उमेदवार मोठ्या संख्येने होते, त्यामुळे मतटक्का वाढला. 

जातीय समीकरणे खूपच तीव्र होती. आपापल्या जाती-समूहाच्या उमेदवारांना मतदान करण्याकडे कल दिसून आला. 

निवडणूक आयोगासह विविध संघटनांनी मतटक्का वाढण्यासाठी प्रयत्न केले.  

महायुतीचे दावे

लाडकी बहीण योजना, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, वीजबिल माफी, निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने यामुळे आमच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले. प्रो-इन्कम्बन्सी होती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आखलेली रणनीती, लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणात केलेली मतदार नोंदणी याचा फायदा झाला आणि त्यामुळे वाढलेले मतदान आमचेच. 

रा.स्व.संघ आणि भाजपच्या नेटवर्कने ‘आपले’ मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर काढले. 

गेले तीन महिने भाजपने सूक्ष्म नियोजन केले. बाहेरील राज्यांमधील मोठ्या नेत्यांना मतदारसंघांची जबाबदारी दिली. लोकसभेतील खड्डे बुजविण्यात यश आले. 

महाविकास आघाडीचे दावे

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीविरोधात लाट होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान झाले. तसेच, लाडकी बहीण आणि इतर निर्णय कसे फसवे आहेत, हे मतदारांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून नाराजी व्यक्त केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत भाजपने पाडलेली फूट मतदारांना पसंती नव्हती, त्यांनी महायुतीविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान केले. अँटी इन्कम्बन्सी होती. 

लोकसभेप्रमाणेच काँग्रेसमध्ये मोठा उत्साह होता, कुठेही आपसात वाद नव्हते, त्याचा फायदा झाला. शरद पवार यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान