शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

Maharashtra Election 2024: वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता? बदलू शकतात अनेक ठिकाणची समीकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 09:04 IST

Maharashtra Election Updates: सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत. 

मुंबई : २०१९ च्या तुलनेत अनेक मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची कारणे व त्या वाढीव मतटक्क्यांचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.   वाढीव मतदान सत्तारुढ महायुतीला फटका देईल की, महाविकास आघाडीला याबद्दल वेगवेगळे तर्क दिले जात आहेत. 

सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत. 

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निश्चितपणे आम्हालाच फायदा झालेला आहे. निकालात तो प्रतिबिंबित होईल. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, सरकारविरोधात लाट असली तरच मतदान मोठ्या प्रमाणात वाढते, यावेळी तेच झाले असून निकालात दिसेल.

मतटक्का वाढण्याची अन्य कारणे कोणती? 

अपक्ष व बंडखोर उमेदवार मोठ्या संख्येने होते, त्यामुळे मतटक्का वाढला. 

जातीय समीकरणे खूपच तीव्र होती. आपापल्या जाती-समूहाच्या उमेदवारांना मतदान करण्याकडे कल दिसून आला. 

निवडणूक आयोगासह विविध संघटनांनी मतटक्का वाढण्यासाठी प्रयत्न केले.  

महायुतीचे दावे

लाडकी बहीण योजना, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, वीजबिल माफी, निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने यामुळे आमच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले. प्रो-इन्कम्बन्सी होती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आखलेली रणनीती, लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणात केलेली मतदार नोंदणी याचा फायदा झाला आणि त्यामुळे वाढलेले मतदान आमचेच. 

रा.स्व.संघ आणि भाजपच्या नेटवर्कने ‘आपले’ मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर काढले. 

गेले तीन महिने भाजपने सूक्ष्म नियोजन केले. बाहेरील राज्यांमधील मोठ्या नेत्यांना मतदारसंघांची जबाबदारी दिली. लोकसभेतील खड्डे बुजविण्यात यश आले. 

महाविकास आघाडीचे दावे

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीविरोधात लाट होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान झाले. तसेच, लाडकी बहीण आणि इतर निर्णय कसे फसवे आहेत, हे मतदारांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून नाराजी व्यक्त केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत भाजपने पाडलेली फूट मतदारांना पसंती नव्हती, त्यांनी महायुतीविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान केले. अँटी इन्कम्बन्सी होती. 

लोकसभेप्रमाणेच काँग्रेसमध्ये मोठा उत्साह होता, कुठेही आपसात वाद नव्हते, त्याचा फायदा झाला. शरद पवार यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान