शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:49 IST

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : एकाच दिवशी मतदान होणार आहे, याचे आम्ही स्वागत करतो; परंतु मतमोजणी तीन दिवसांनंतर होणार, यावर आमचा आक्षेप आहे. या तीन दिवसांत काहीही गडबड होऊ शकते. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करून दुसऱ्याच दिवशी मतमोजणीची मागणी करणार आहोत, अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले, बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना तसेच अपक्ष उमेदवारांना कोणतेही स्थान अथवा पाठिंबा नसेल. मात्र, मित्रपक्षांना आवश्यक त्याठिकाणी जागा सोडून पाठबळ दिले जाईल. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. ती रुळावर आणण्यासाठी आम्ही योजना राबविणार आहोत. तसेच या जुमलेबाज सरकारला जनता वैतागली आहे. त्यामुळे जनतेसमोर तिसरा व चांगला पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडी पुढे आली आहे.भाजप-सेना, काँग्रेस आघाडी यांना एकजातीय स्वरूप आले असून, तेथे वंचितांना न्याय नाही. आम्ही भाजपची बी टीम असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या कित्येक नेत्यांवर ४२० चे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याची टीका आंबेडकर यांनी केली.बंद खोलीत चर्चाबहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त इचलकरंजीत आले होते. त्यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद खोलीत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेबाबत राज्यातील राजकीय स्थितीसंदर्भात औपचारिक चर्चा झाली असल्याचे आवाडे यांनी सांगितले असले तरी मैत्रीपूर्ण लढतीसाठी भेट झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर