शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:49 IST

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : एकाच दिवशी मतदान होणार आहे, याचे आम्ही स्वागत करतो; परंतु मतमोजणी तीन दिवसांनंतर होणार, यावर आमचा आक्षेप आहे. या तीन दिवसांत काहीही गडबड होऊ शकते. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करून दुसऱ्याच दिवशी मतमोजणीची मागणी करणार आहोत, अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले, बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना तसेच अपक्ष उमेदवारांना कोणतेही स्थान अथवा पाठिंबा नसेल. मात्र, मित्रपक्षांना आवश्यक त्याठिकाणी जागा सोडून पाठबळ दिले जाईल. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. ती रुळावर आणण्यासाठी आम्ही योजना राबविणार आहोत. तसेच या जुमलेबाज सरकारला जनता वैतागली आहे. त्यामुळे जनतेसमोर तिसरा व चांगला पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडी पुढे आली आहे.भाजप-सेना, काँग्रेस आघाडी यांना एकजातीय स्वरूप आले असून, तेथे वंचितांना न्याय नाही. आम्ही भाजपची बी टीम असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या कित्येक नेत्यांवर ४२० चे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याची टीका आंबेडकर यांनी केली.बंद खोलीत चर्चाबहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त इचलकरंजीत आले होते. त्यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद खोलीत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेबाबत राज्यातील राजकीय स्थितीसंदर्भात औपचारिक चर्चा झाली असल्याचे आवाडे यांनी सांगितले असले तरी मैत्रीपूर्ण लढतीसाठी भेट झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर