शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Vidhan Sabha 2019 : एमआयएम नसली तरी चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:49 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे.

कल्याण : विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे. मात्र युती झाली नाही तरी, वंचित आघाडीला फारसा फरक पडणार नसल्याचा दावा वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी कल्याणमध्ये केले. महिला कार्यकारिणी गठीत करण्यासाठी त्यांनी मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी लोकमतशी बोलताना एमआयएमच्या युतीबाबत त्यांनी भाष्य केले.लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे अध्यक्ष अकरूबुद्दीन ओवेसी यांची चांगली साथ लाभली. पण मुस्लिम समाजाचे मतविभाजन झाल्याने एमआयएमचे संघटन त्या निवडणुकीत दिसून आले नाही. त्या निवडणुकीत मोठा भार वंचित आघाडीनेच उचलला होता. त्यामुळे एमआयएमशी विधानसभा निवडणुकीत युती नाही झाली तरी, वंचितला फारसा फरक पडणार नाही, असे ठाकूर म्हणाल्या. महत्वाचे म्हणजे, मुस्लिम समाजात जे घटक आहेत, त्यांचा कल वंचित आघाडीकडे आहे. त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या २८८ पैकी २५ उमेदवार मुस्लिम समाजातील असतील, हे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. महिला आघाडीची कार्यकारिणी गठन करण्यासाठी ठिकठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत. सर्व समाजातील लोकांना आघाडीत घेतले जाणार आहे. उच्चशिक्षित आणि राजकीय समज असलेले कार्यकर्ते आघाडीत असावेत, यावर आमचा भर असून, या माध्यमातून लढाऊ राजकीय संघटन उभे करण्याचा आघाडीचा प्रयत्न असल्याचेही ठाकूर म्हणाल्या. यावेळी ठाकूर यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सदस्या रोहीणी ठेकळे होत्या. धर्मा वक्ते, रूपेश हुंबरे, प्रतिक साबळे, रविंद्र संगारे आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.>बाळासह उपस्थितकल्याणमधील शासकीय विश्रामगृहात कार्यकारिणीसाठी शेकडोहून अधिक महिलांनी मुलाखती दिल्या. एकेकाळच्या काँग्रेसमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या व सध्या वंचित आघाडीत असलेल्या शारदा बागुल यांनीही मुलाखत दिली. विशेष म्हणजे उल्हासनगरमधील प्रिया पेठारे या सात दिवसांच्या बाळाला घेऊन मुलाखतीसाठी आल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी