शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Vidhan Sabha 2019: भाजपचे शक्तिकेंद्र मेळावे; मुख्यमंत्र्यांनी दिले रिपोर्ट कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:17 IST

२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भाजपने पाच बुथचे मिळून बनलेल्या २० हजार शक्तिकेंद्रांचे मेळावे राज्यभर आयोजित करण्याचे ठरविले आहे. २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांतील त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर सादर केले. राज्याच्या इतिहासात पूर्वी कधीही असे घडलेले नव्हते. सुमारे चार हजार किलोमीटरची ही यात्रा म्हणजे संवादयात्राच होती. जनभावनाही मुख्यमंत्र्यांना जाणून घेता आल्या, असे पाटील म्हणाले. शेतकरी कर्जमाफी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण, धनगर, ओबीसी समाजाला दिलेल्या सवलती, विविध योजनांच्या लाभार्र्थींच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम देणे आदी निर्णयांमुळे सरकारबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचा दावा त्यांनी केला.पाच बूथमागे एक शक्तिकेंद्र अशी रचना प्रदेश भाजपने केली. त्यानसुार २० हजार शक्तिकेंद्रांची रचना केली असून एकेका शक्तीकेंद्राचे मेळावे आता आयोजित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे, महाजनादेश यात्रेचे मुख्य संयोजक आ. सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस