शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Vidhan Sabha 2019: भाजपचे शक्तिकेंद्र मेळावे; मुख्यमंत्र्यांनी दिले रिपोर्ट कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:17 IST

२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भाजपने पाच बुथचे मिळून बनलेल्या २० हजार शक्तिकेंद्रांचे मेळावे राज्यभर आयोजित करण्याचे ठरविले आहे. २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांतील त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर सादर केले. राज्याच्या इतिहासात पूर्वी कधीही असे घडलेले नव्हते. सुमारे चार हजार किलोमीटरची ही यात्रा म्हणजे संवादयात्राच होती. जनभावनाही मुख्यमंत्र्यांना जाणून घेता आल्या, असे पाटील म्हणाले. शेतकरी कर्जमाफी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण, धनगर, ओबीसी समाजाला दिलेल्या सवलती, विविध योजनांच्या लाभार्र्थींच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम देणे आदी निर्णयांमुळे सरकारबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचा दावा त्यांनी केला.पाच बूथमागे एक शक्तिकेंद्र अशी रचना प्रदेश भाजपने केली. त्यानसुार २० हजार शक्तिकेंद्रांची रचना केली असून एकेका शक्तीकेंद्राचे मेळावे आता आयोजित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे, महाजनादेश यात्रेचे मुख्य संयोजक आ. सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस