शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Vidhan Sabha 2019: भाजपचे शक्तिकेंद्र मेळावे; मुख्यमंत्र्यांनी दिले रिपोर्ट कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:17 IST

२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भाजपने पाच बुथचे मिळून बनलेल्या २० हजार शक्तिकेंद्रांचे मेळावे राज्यभर आयोजित करण्याचे ठरविले आहे. २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांतील त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर सादर केले. राज्याच्या इतिहासात पूर्वी कधीही असे घडलेले नव्हते. सुमारे चार हजार किलोमीटरची ही यात्रा म्हणजे संवादयात्राच होती. जनभावनाही मुख्यमंत्र्यांना जाणून घेता आल्या, असे पाटील म्हणाले. शेतकरी कर्जमाफी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण, धनगर, ओबीसी समाजाला दिलेल्या सवलती, विविध योजनांच्या लाभार्र्थींच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम देणे आदी निर्णयांमुळे सरकारबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचा दावा त्यांनी केला.पाच बूथमागे एक शक्तिकेंद्र अशी रचना प्रदेश भाजपने केली. त्यानसुार २० हजार शक्तिकेंद्रांची रचना केली असून एकेका शक्तीकेंद्राचे मेळावे आता आयोजित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे, महाजनादेश यात्रेचे मुख्य संयोजक आ. सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस