शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:07 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे.

- धनंजय वाखारे नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीकडून मित्रपक्षांना १८ जागा देण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आठवले गटाने ५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणी शिवसेना, तर दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे आता भाजप-सेना या जागा रिपाइंला सोडणार काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यातही रिपाइंने ज्या दोन मतदारसंघांत पाच आकडी मते घेतली ते पिंपरी आणि चेंबूर हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडे असल्याने रिपाइंला ते मिळण्याची शक्यता जवळपास मावळल्यातच जमा आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर रामदास आठवले यांच्या रिपाइंने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने रिपाइंला आठ जागा देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात रिपाइंने पाच जागांवर उमेदवार दिले. त्यातही चिमूर आणि वडगाव शेरी मतदारसंघात रिपाइंने उमेदवार देतानाच भाजपनेही उमेदवार उभे केले होते. उर्वरित विक्रोळी, चेंबूर आणि पिंपरी या मतदारसंघात भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. चिमूरमधून हेमंत भाईसारे (४५५ मते), वडगाव शेरीमधून डॉ. सिद्धार्थ धेंडे (९२४७ मते), पिंपरीतून चंद्रकांत सोनकांबळे (४७२८८ मते), चेंबूरमधून दीपक निकाळजे (३६६१५ मते), तर विक्रोळीतून विवेक पंडित (६९७५ मते) हे कपबशी चिन्हावर निवडणूक लढले होते. चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया विजयी झाले, तर रिपाइंचा उमेदवार १७ व्या क्रमांकावर राहिला. विक्रोळीतून शिवसेनेचे सुनील राऊत यांची सरशी झाली, तर रिपाइंचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. चेंबूरमधून शिवसेनेचे प्रकाश फातरेपेकर यांनी विजय मिळविला. रिपाइं तिसऱ्या स्थानावर राहिली. पिंपरी येथे शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार विजयी झाले होते. येथेही रिपाइं तिसºया स्थानावर होती. वडगाव शेरीमधून भाजपचे जगदीश मुळक विजयी झाले होते. येथे रिपाइं सहाव्या स्थानावर होती. रिपाइंच्या पाचपैकी तीन ठिकाणी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.>२०१४ मध्ये मिळाली लाखभरच मतेनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिपाइंला एकही जागा दिली नव्हती. त्या बदल्यात केंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रिपाइंला लढलेल्या पाचही जागा मिळून अवघी १ लाख ५८० मते मिळाली होती. त्यामुळे यंदाही रिपाइंच्या वाट्याला तीन ते चार जागा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आठवले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रिपाइंला प्रत्यक्षात सोडलेल्या तीनही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे रिपाइंच्या पारड्यात कोणत्या जागा टाकायच्या याबाबत पेच निर्माण झालेला आहे. त्यातच शिवसेनेने भाजपला त्यांच्या मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा सोडण्याचा आग्रह धरल्याने भाजपची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019