शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:07 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे.

- धनंजय वाखारे नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीकडून मित्रपक्षांना १८ जागा देण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आठवले गटाने ५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणी शिवसेना, तर दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे आता भाजप-सेना या जागा रिपाइंला सोडणार काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यातही रिपाइंने ज्या दोन मतदारसंघांत पाच आकडी मते घेतली ते पिंपरी आणि चेंबूर हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडे असल्याने रिपाइंला ते मिळण्याची शक्यता जवळपास मावळल्यातच जमा आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर रामदास आठवले यांच्या रिपाइंने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने रिपाइंला आठ जागा देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात रिपाइंने पाच जागांवर उमेदवार दिले. त्यातही चिमूर आणि वडगाव शेरी मतदारसंघात रिपाइंने उमेदवार देतानाच भाजपनेही उमेदवार उभे केले होते. उर्वरित विक्रोळी, चेंबूर आणि पिंपरी या मतदारसंघात भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. चिमूरमधून हेमंत भाईसारे (४५५ मते), वडगाव शेरीमधून डॉ. सिद्धार्थ धेंडे (९२४७ मते), पिंपरीतून चंद्रकांत सोनकांबळे (४७२८८ मते), चेंबूरमधून दीपक निकाळजे (३६६१५ मते), तर विक्रोळीतून विवेक पंडित (६९७५ मते) हे कपबशी चिन्हावर निवडणूक लढले होते. चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया विजयी झाले, तर रिपाइंचा उमेदवार १७ व्या क्रमांकावर राहिला. विक्रोळीतून शिवसेनेचे सुनील राऊत यांची सरशी झाली, तर रिपाइंचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. चेंबूरमधून शिवसेनेचे प्रकाश फातरेपेकर यांनी विजय मिळविला. रिपाइं तिसऱ्या स्थानावर राहिली. पिंपरी येथे शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार विजयी झाले होते. येथेही रिपाइं तिसºया स्थानावर होती. वडगाव शेरीमधून भाजपचे जगदीश मुळक विजयी झाले होते. येथे रिपाइं सहाव्या स्थानावर होती. रिपाइंच्या पाचपैकी तीन ठिकाणी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.>२०१४ मध्ये मिळाली लाखभरच मतेनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिपाइंला एकही जागा दिली नव्हती. त्या बदल्यात केंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रिपाइंला लढलेल्या पाचही जागा मिळून अवघी १ लाख ५८० मते मिळाली होती. त्यामुळे यंदाही रिपाइंच्या वाट्याला तीन ते चार जागा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आठवले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रिपाइंला प्रत्यक्षात सोडलेल्या तीनही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे रिपाइंच्या पारड्यात कोणत्या जागा टाकायच्या याबाबत पेच निर्माण झालेला आहे. त्यातच शिवसेनेने भाजपला त्यांच्या मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा सोडण्याचा आग्रह धरल्याने भाजपची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019