शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:07 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे.

- धनंजय वाखारे नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीकडून मित्रपक्षांना १८ जागा देण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आठवले गटाने ५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणी शिवसेना, तर दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे आता भाजप-सेना या जागा रिपाइंला सोडणार काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यातही रिपाइंने ज्या दोन मतदारसंघांत पाच आकडी मते घेतली ते पिंपरी आणि चेंबूर हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडे असल्याने रिपाइंला ते मिळण्याची शक्यता जवळपास मावळल्यातच जमा आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर रामदास आठवले यांच्या रिपाइंने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने रिपाइंला आठ जागा देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात रिपाइंने पाच जागांवर उमेदवार दिले. त्यातही चिमूर आणि वडगाव शेरी मतदारसंघात रिपाइंने उमेदवार देतानाच भाजपनेही उमेदवार उभे केले होते. उर्वरित विक्रोळी, चेंबूर आणि पिंपरी या मतदारसंघात भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. चिमूरमधून हेमंत भाईसारे (४५५ मते), वडगाव शेरीमधून डॉ. सिद्धार्थ धेंडे (९२४७ मते), पिंपरीतून चंद्रकांत सोनकांबळे (४७२८८ मते), चेंबूरमधून दीपक निकाळजे (३६६१५ मते), तर विक्रोळीतून विवेक पंडित (६९७५ मते) हे कपबशी चिन्हावर निवडणूक लढले होते. चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया विजयी झाले, तर रिपाइंचा उमेदवार १७ व्या क्रमांकावर राहिला. विक्रोळीतून शिवसेनेचे सुनील राऊत यांची सरशी झाली, तर रिपाइंचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. चेंबूरमधून शिवसेनेचे प्रकाश फातरेपेकर यांनी विजय मिळविला. रिपाइं तिसऱ्या स्थानावर राहिली. पिंपरी येथे शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार विजयी झाले होते. येथेही रिपाइं तिसºया स्थानावर होती. वडगाव शेरीमधून भाजपचे जगदीश मुळक विजयी झाले होते. येथे रिपाइं सहाव्या स्थानावर होती. रिपाइंच्या पाचपैकी तीन ठिकाणी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.>२०१४ मध्ये मिळाली लाखभरच मतेनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिपाइंला एकही जागा दिली नव्हती. त्या बदल्यात केंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रिपाइंला लढलेल्या पाचही जागा मिळून अवघी १ लाख ५८० मते मिळाली होती. त्यामुळे यंदाही रिपाइंच्या वाट्याला तीन ते चार जागा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आठवले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रिपाइंला प्रत्यक्षात सोडलेल्या तीनही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे रिपाइंच्या पारड्यात कोणत्या जागा टाकायच्या याबाबत पेच निर्माण झालेला आहे. त्यातच शिवसेनेने भाजपला त्यांच्या मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा सोडण्याचा आग्रह धरल्याने भाजपची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019