शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर

By यदू जोशी | Updated: September 20, 2019 04:57 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भाजपाची भूमिका

यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्याने आणि त्याचवेळी लहान मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याने शिवसेनेच्या वाट्याला उर्वरित १२० जागा येतात. शिवसेना त्यासाठी राजी होत नसल्याने युतीच्या मार्गात बाधा निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने शिवसेनेसमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावात असे नमूद करण्यात आले की गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा काही जागा जादा यावेळी जिंकणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला गेल्यावेळच्या यशाचीही पुनरावृत्ती करता आली नाही असे चित्र निकालात समोर आले तर ते पक्षाची मानहानी करणारे असेल.कोणताही पक्ष लोकप्रियतेच्या कितीही शिखरावर असला तरी त्याच्या यशाचे प्रमाण हे ८० टक्के इतके असते याकडे भाजपने शिवसेनेचे लक्ष वेधले असून त्यामुळेच किमान १२२ जागा जिंकायच्या तर १५० जागा लढाव्या लागतील असा तर्क दिला आहे. भाजपकडून शिवसेनेला हेही सांगितले जात आहे की २०१४ मध्ये शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. आता त्यांनी १२० जागा लढविल्या आणि युतीची लाट असल्याचे लक्षात घेता ८० टक्के जागा जिंकल्या तरी त्यांचे ९५ आमदार निवडून येऊ शकतात.शिवसेनेचे त्यापेक्षा दहा जागा कमी आल्या तरी त्यांचे ८५ आमदार निवडून येतील. ही संख्या त्यांच्या मागील संख्याबळापेक्षा २२ ने जास्त असेल. भाजपला गेल्यावेळचे संख्याबळ टिकवून जादा दहा जागा जास्त जिंकायच्या तरी १५० पेक्षा कमी जागा लढवून चालणार नाही.शिवसेनेने १२० जागा लढविल्या तरी स्वत:कडील ६३ जागांव्यतिरिक्त ५७ जागा त्यांना लढायला मिळतात. जेव्हा की भाजपने १५० जागा लढल्या तर त्यांना स्वत:कडील १२२ जागांव्यतिरिक्त केवळ २८ जादा जागा लढायला मिळतात. त्यातही सहा विद्यमान आमदार आणिकाँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या १४ इतकी आहे. ती गृहित धरल्यास नव्या केवळ १४ जागा लढण्याचा वाव भाजपला असेल.>मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीची प्रतीक्षायुती करताना भाजपचा असा कोंडमारा होत असल्याने आणि त्याचवेळी शिवसेना १२० जागांवर समाधान मानण्यास तयार नसल्याने युतीचे घोडे अडले आहे. मात्र, महाजनादेश यात्रेवरून परतलेले मुख्यमंत्री चाणक्यनीती वापरून तोडगा काढतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे