शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर

By यदू जोशी | Updated: September 20, 2019 04:57 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भाजपाची भूमिका

यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्याने आणि त्याचवेळी लहान मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याने शिवसेनेच्या वाट्याला उर्वरित १२० जागा येतात. शिवसेना त्यासाठी राजी होत नसल्याने युतीच्या मार्गात बाधा निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने शिवसेनेसमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावात असे नमूद करण्यात आले की गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा काही जागा जादा यावेळी जिंकणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला गेल्यावेळच्या यशाचीही पुनरावृत्ती करता आली नाही असे चित्र निकालात समोर आले तर ते पक्षाची मानहानी करणारे असेल.कोणताही पक्ष लोकप्रियतेच्या कितीही शिखरावर असला तरी त्याच्या यशाचे प्रमाण हे ८० टक्के इतके असते याकडे भाजपने शिवसेनेचे लक्ष वेधले असून त्यामुळेच किमान १२२ जागा जिंकायच्या तर १५० जागा लढाव्या लागतील असा तर्क दिला आहे. भाजपकडून शिवसेनेला हेही सांगितले जात आहे की २०१४ मध्ये शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. आता त्यांनी १२० जागा लढविल्या आणि युतीची लाट असल्याचे लक्षात घेता ८० टक्के जागा जिंकल्या तरी त्यांचे ९५ आमदार निवडून येऊ शकतात.शिवसेनेचे त्यापेक्षा दहा जागा कमी आल्या तरी त्यांचे ८५ आमदार निवडून येतील. ही संख्या त्यांच्या मागील संख्याबळापेक्षा २२ ने जास्त असेल. भाजपला गेल्यावेळचे संख्याबळ टिकवून जादा दहा जागा जास्त जिंकायच्या तरी १५० पेक्षा कमी जागा लढवून चालणार नाही.शिवसेनेने १२० जागा लढविल्या तरी स्वत:कडील ६३ जागांव्यतिरिक्त ५७ जागा त्यांना लढायला मिळतात. जेव्हा की भाजपने १५० जागा लढल्या तर त्यांना स्वत:कडील १२२ जागांव्यतिरिक्त केवळ २८ जादा जागा लढायला मिळतात. त्यातही सहा विद्यमान आमदार आणिकाँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या १४ इतकी आहे. ती गृहित धरल्यास नव्या केवळ १४ जागा लढण्याचा वाव भाजपला असेल.>मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीची प्रतीक्षायुती करताना भाजपचा असा कोंडमारा होत असल्याने आणि त्याचवेळी शिवसेना १२० जागांवर समाधान मानण्यास तयार नसल्याने युतीचे घोडे अडले आहे. मात्र, महाजनादेश यात्रेवरून परतलेले मुख्यमंत्री चाणक्यनीती वापरून तोडगा काढतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे