शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: तीन कोटी मतदारांना भेटणार भाजप नेते; स्वबळावर सत्तेची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:50 IST

शिवसेनेबरोबर युती पण स्वत:च्या अटींवर

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आपल्या अटींवर युती करण्याची तयारी केलेल्या भाजपने तसे न घडल्यास पर्यायी व्यवस्थेचीही तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात भाजपचे नेते व कार्यकर्ते येत्या दहा दिवसांत जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त मतदारांना भेटतील. ही संख्या यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा जास्त आहेत. भाजपला वाटते की, बालाकोट, अनुच्छेद ३७० रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे राज्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते. या पार्श्वभूमीवर भाजपला स्वत:च्या सरकारची तयारी सुरू करायला हवी. युती झाली तर चांगलेच पण न झाली तर भाजप त्याला अधिक चांगले समजतो आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात १.४९ कोटींपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षा ही मते एक लाखाने कमी आहेत. भाजपच्या एका नेत्याने म्हटले की, वेगवेगळ्या कारणांनी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते १०० टक्के मतदान करीत नाहीत. परंतु, भाजपने हे पाहिले की आपल्या एकूण कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षाही जास्त मते गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की, फक्त भाजप कार्यकर्ताच नव्हे तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या विचारांच्या मतदारांनीही भाजपला मत दिले. याचा स्पष्ट संकेत हा आहे की महाराष्ट्रात सामान्य लोक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावावर मते देत आहेत. या परिस्थितीत शिवसेनेने ठरवायचे आहे की, आपण भाजपसोबत राहू इच्छितो की स्वतंत्र? भाजपच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत १.२५ कोटींपेक्षा जास्त मते मिळाली होती. भाजप आणि शिवसेना यांची मते एकत्र केली तर ती जवळपास २.७५ कोटी होतात. राज्यात आम्ही येत्या दहा दिवसांत औपचारिक आणि अनौपचारिकपणे तीन कोटींपेक्षा जास्त मतदारांशी संपर्ककरणार आहोत. अमित शहा यांचे महाराष्ट्रातील दोन दौरे पूर्ण झाले आहेत. येत्या दिवसांत अशा प्रकारच्या कार्यक्रमांची संख्या वाढवली जाईल. म्हणजे जास्त लोकांपर्यंत भाजपची धोरणे पोहोचवता येतील. आम्हाला आशा आहे की आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो.भाजपचा पदाधिकारी म्हणाला की, लोकसभा निवडणुकीत आम्ही जवळपास २७ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. शिवसेनेला २३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ तर १६ टक्क्यांपेक्षा जास्त मते काँग्रेसला मिळाली होती. यातून हे स्पष्ट होते की राज्यात प्रमुख भूमिकेत कोणत्या पक्षाने यायला हवे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना