शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: 'आघाडीचं ठरलं मात्र युतीचं घोडं अडलं; निम्म्या जागा दिल्या तरच युती अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 08:53 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणारं सरकार आपलंच असेल अन् पुढचा.. तुम्ही समजून जा असं विधान करुन मुख्यमंत्री पदावरचा दावा शिवसेनेने सोडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागेल त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून आमचं ठरलंय असं म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचं घोडं जागावाटपात अडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून युतीच्या चर्चेला मात्र ब्रेक लागला आहे. 

अशातच विधानसभा निवडणुकीत 144 जागा मिळाल्या तर युती अन्यथा युती तुटण्याची शक्यता आहे असं विधान शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. तर युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्यात शिवसेना विश्वासघात करणार नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Image result for Shiv Sena BJP

गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत बोलणी थांबविण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिल्याने युतीची चर्चा पुढे सरकली नाही. शिवसेनेला जास्तीत जास्त 120 जागा सोडण्याचा भाजपाचा इरादा आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येणार यातून पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार हे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपाचं ठरलंय असं म्हणणारे नेते आता युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगून उत्तर देणं टाळत आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणारं सरकार आपलंच असेल अन् पुढचा.. तुम्ही समजून जा असं विधान करुन मुख्यमंत्री पदावरचा दावा शिवसेनेने सोडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आरेमधील कारशेडवरुनही शिवसेना-भाजपात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आरेतील कारशेडला शिवसेनेने विरोध केला आहे. नाणारचं जे झालं ते आरेचं होईल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली मात्र मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये पुन्हा रिफायनरीबाबत चर्चा होऊ शकते असं विधान करुन अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे. 

दिवाकर रावते यांच्या विधानावरुन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी ज्यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी बोलू नये असं सांगत दिवाकर रावतेंवर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच युतीबाबत निश्चित सांगू शकतात. पण शिवसेना-भाजपा युती 100 टक्के होणारच असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019