शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

राज्याला पुन्हा वळवाचा तडाखा, गारपीट, वादळी वाऱ्याने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 06:50 IST

पुढील दाेन दिवस पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादळी वारा व विजांच्या कडकडाटात शुक्रवारी झालेल्या वळवाच्या पावसाने राज्याला झोडपले असून वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यात ३५ जनावरे दगावले असून आंबा, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा वादळी वाऱ्याने उरली-सुरली पिके मातीत गेली आहेत.

शुक्रवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटात अनेक भागांत गारपीट आणि जोरदार पाऊस झाला.

भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू- बुलढाण्यातील काटेल धाम (ता. संग्रामपूर) येथे भिंत कोसळून कृष्णाली बोरकर या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

विदर्भात मोठे नुकसान- पश्चिम विदर्भात वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला, फळपिके व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू- वीज पडल्याने बुलढाण्यातील चितोडा (ता. खामगाव) येथे गोपाल महादेव कवळे (वय ४०), कोल्हापुरात मौजे रेठरे (ता. शाहूवाडी) येथे बाबूराब दादू जाधव (६१) यांचा मृत्यू झाला.

आंब्याचे नुकसान- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. सांगलीतील शिराळा तालुका, कोल्हापूरमधील करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुका, सातारा जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची हजेरी होती.

राज्यात ३५ जनावरे ठार- अकोल्यातील माझोड येथे गारांच्या तडाख्याने दहा शेळ्या दगावल्या. यात पळशी खुर्द (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथे आठ शेळ्या, सोंडी (ता. सेलू, जि. वर्धा) येथे बैल, पेढी आणि संगम (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे एक गाय, दोन बैल  ठार झाले. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी