शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

देशातील दुसरा मोठा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 07:05 IST

पंचसूत्रीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प, गेल्या वर्षाची २.९ टक्क्यांपर्यंत असणारी राजकोषीय तूट यावेळी २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात आले यश

मुंबई: शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशा पंचसूत्रीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे. संतुलित अर्थसंकल्पाला अनुसरून सरकारची पुढील वाटचाल असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

विधिमंडळातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षाची २.९ टक्क्यांपर्यंत असणारी राजकोषीय तूट यावेळी २.७टक्क्यांपर्यंत राखण्यात यश आले आहे. महसुली जमा आणि खर्च यांचा ताळमेळ राखण्यात आला आहे. अर्थसंकल्पाचे आकारमान सात लाख कोटींवर पोहोचल्यामुळे उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारे महाराष्ट्र दुसरे राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संतुलन राखणारे चॅम्पियन बजेट : एकनाथ शिंदे राज्यात अडीच वर्षांपासून लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा सुरू आहेत. त्यांचे योग्य संतुलन राखणारे हे चॅम्पियन बजेट आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही हा निर्धार अर्थसंकल्पातून व्यक्त होतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

अजित पवार यांनी समतोल राखून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल, अशा तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

लाडक्या बहिणी ते लखपती दीदी... 

लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी काही बहिणींनी योजनेतून मिळणाऱ्या पैशांतून सोसायट्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज्यस्तरीय अपेक्स सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, २३ लाख लखपती दीदींचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, एक कोटी लखपती दीर्दीचे लक्ष्य गाठायचे.

अदलाबदल अन् बदलाबदल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिंदे असे म्हणाले की, आम्ही गेल्यावेळीही तिघे एकत्र होतो. आता खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. त्यावर 'मनातून खुर्ची काही जात नाही ते' असे अजित पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला. आमच्यात खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे, बदलाबदल नाही, अशी कोटी फडणवीस यांनी केली.

सकल राज्य घरेलू उत्पादनाचे प्रमाण ७.५ टक्क्यांवर; पाच ते दहा लाख कोटींनी वाढ 

महाराष्ट्राची जीएसडीपीचे प्रमाण ७.५ टक्क्यांवर पोहोचले असून, ते पाच ते दहा लाख कोटींनी वाढले. त्यामुळे कर्ज घेण्याची मर्यादा त्या प्रमाणात वाढली. परंतु, विहित कर्ज मर्यादेचे उल्लंघन केले नाही, हे उल्लेखनीय आहे. २० वर्षाचा विचार करून रस्ते विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे गाव ते राज्य पातळीपर्यंत समान पद्धतीने रस्त्यांचा आराखडा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार