शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

CoronaVirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्के; ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 22:19 IST

CoronaVirus: गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे.

ठळक मुद्देमुंबईतील रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवरराज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८०सोमवार दिवसभरात ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २२ हजार १२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 22 122 new corona cases and 361 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २२ हजार १२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८० आहे.

आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

मुंबईलाही मोठा दिलासा

गेल्या सलग ५ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५७ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ३१२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ६७१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २८ हजार ८६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.२० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवर गेला आहे. 

‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ०२ हजार १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २७ लाख २९ हजार ३०१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर २४ हजार ९३२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र