शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

CoronaVirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्के; ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 22:19 IST

CoronaVirus: गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे.

ठळक मुद्देमुंबईतील रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवरराज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८०सोमवार दिवसभरात ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २२ हजार १२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 22 122 new corona cases and 361 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २२ हजार १२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८० आहे.

आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

मुंबईलाही मोठा दिलासा

गेल्या सलग ५ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५७ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ३१२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ६७१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २८ हजार ८६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.२० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवर गेला आहे. 

‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ०२ हजार १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २७ लाख २९ हजार ३०१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर २४ हजार ९३२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र